शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:12 AM

क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

शंकर पोळ (कोपर्डेहवेली, सातारा)

कमी खर्चात जादा उत्पादन देणारी माळव्याची पिके शेतकरी घेतात. कधी दर मिळतो, तर कधी दराअभावी उत्पादन खर्चही निघत नाही, तर कमी खर्च करून घेतलेली पिकेही फायद्याची ठरतात. असेच पीक क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी घेतले. त्यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

कोपर्डे हवेली येथील मधुकर चव्हाण यांनी कमी खर्चाचे व कमी दिवसांत जादा उत्पादन देणाऱ्या चवळीचे पीक घेतले आहे. २५ गुंठे क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली असून, अंतर्गत भुईमुगाचे पीक आहे. साडेचार फुटी सरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात संकरित चवळीचे टोकण केले. वेल दोन फुटांचे झाल्यानंतर ते तारेवर चढवले. ६५ दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीचे तोडे सुरू झाले. एका चवळी शेंगेची लांबी दीड ते दोन फुटांची असून, गडद हिरव्या रंगाची शेंग आहे.

या शेंगा विक्रीसाठी मुंबईच्या बाजारपेठेत पाठवल्या जातात. एका पेंढीत ४० ते ४५ शेंगा बसतात. एक दिवसाआड करून त्याचे तोडे सुरू आहेत. २५० ते ३०० किलो शेंगा मिळतात. इतर माळव्याच्या पिकाच्या तुलनेत चवळीला बरा दर मिळत आहे. सध्याचा दर मुंबई बाजारपेठेत दहा किलोला साधारणपणे २०० ते २५० रुपये आहे. त्यामुळेच ही चवळी मार्के टमध्ये चांगला भाव खात आहे. आतापर्यंत चव्हाण यांचे चवळीचे चार तोडे झाले आहेत. एका तोड्याचा खर्च जाऊन चार ते साडेचार हजार रुपये मिळाले आहेत.

चवळीच्या पिकाचा कालावधी पाच महिन्यांचा आहे. १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. महिन्याला ६० हजारांचे उत्पन्न धरले, तर पाच महिन्यांत अंदाजे तीन लाख होतात. खर्च वजा करता चव्हाण यांना अडीच लाखांचा नफा होऊ शकतो. आतापर्यंत १५ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. या परिसरात संकरित चवळीच्या शेंगांचे प्रथमच उत्पादन घेतले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भेटी देत आहेत. अनेकांनी माहिती घेऊन आपल्या जमिनीत चवळी शेंगेचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात चवळीचे आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

चवळीच्या शेंगेला मागणी वाढली असून, साधारणपणे २५ ते ३० रुपये किलो दराने चवळी बाजारात विक्री होत आहे. नाशिक, अकोला जिल्ह्यातील चवळीचे पीक सातारा जिल्ह्यात आले असून, वातावरण पोषक असल्याने भविष्यात या पीक क्षेत्रात वाढ होणार आहे. चवळीच्या शेंगांचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले असून, मुंबई बाजारपेठेत इतर पिकांच्या तुलनेत जादा दर मिळत आहे, शेंगा भरपूर आहेत, असाच दर राहिला तर खर्च वजा जाता पाच महिन्यांत दोन ते अडीच लाखांचा नफा अपेक्षित आहे, असे मधुकर चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीvegetableभाज्याMumbaiमुंबई