शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : टँकर सोडल्याने अफवा; आज नाही उद्यापासून सुरू होणार महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 4:26 PM

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन सहावा दिवस उजाडला. रस्त्यावरून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे.

कोल्हापूर :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज सहाव्या दिवशीही ठप्पच आहे. मात्र, आज दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचा संभ्रम परसला होता. यामुळे अडकलेल्या लोकांनी वाहनांसह महामार्गाच्या दिशेने कूच केली होती. यामुळे पोलीस अधिक्षकांना खुलासा करावा लागला असून महामार्गावरील पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे. 

महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नसून, अत्यावश्यक सेवा बोटीतूनच पुरवण्यात येणार आहे. केवळ इंधनाचे टँकर आणि अॅम्बुलन्सनाच महामार्गावरून वाट करून दिली जाणार आहे. महामार्गावर अद्याप पाणी असून ते ओसरल्यानंतरच म्हणजेच उद्या, सोमवारपासून महामार्ग खुला करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन सहावा दिवस उजाडला. रस्त्यावरून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्री (ता. १० ) पासून काल सकाळ दहापर्यंत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फुटाने कमी झाली असून, तरी अद्याप तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. तसेच पाण्याचा वेगही मोठा आहे. 

महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलेनसह पाठवून घेतली. टँकर पाण्याचा रस्ता पार करून गेला; मात्र पाण्याला वेग वाहतूक सुरक्षीत नसल्याचे जाणवले. त्यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूकही होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपत्कालीनच्या बोट मधूनच केला जाणार आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पूराचे पाणी असून, अनेक ठिकाणी महामार्ग बंद आहे. त्यामुळे बंगळुरूकडे जाण्यासाठी सोलापूर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. देशमुख यांनी केले. सांगली फाटा येथे महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहनांची घेतलेली चाचणी अयशस्वी झाली आहे. त्यामुळे आज महामार्गावरील वाहतूक बंदच राहणार असल्याचं पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरBengaluruबेंगळूरPuneपुणे