शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 09:07 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला. 

कोल्हापूर - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) ५ वर्षात ५ पंतप्रधान असा जावईशोध नरेंद्र मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा नाही. पुरेसे संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास ५ वर्षात ५ पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला?, आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. १९७७ साली जेपी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला, तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारले जायचे. तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढे आले. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत स्थिर सरकार देत अखंड ५ वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे ५ वर्ष ५ पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय मोदींना समाधान वाटत नाही. त्यांची स्टाईल आहे, कोल्हापूरात आले तर नमस्कार कोल्हापूरकर असं बोलून सुरुवात करणार. पहिले ३-४ वाक्य त्यांचे स्थानिक नेते लिहून देतात ते बोलतात, कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेतले नाही, भाषणात कराडचा उल्लेख केला नाही, सातारचा केला असा टोला शरद पवारांनी लगावला. 

दरम्यान, विदर्भात उमेदवार प्रभावी असून ५० टक्क्यांच्या आत मतदान झालं, लोक उदासीन असतील किंवा आम्हा लोकांच्या कामामुळे अस्वस्थ असतील, अथवा वातावरणामुळेही मतदान कमी झालं असावं. आता मतदानाची टक्केवारी वाढतेय. या देशात अलीकडच्या काळात वास्तवता, सत्य लपवणारा पंतप्रधान पाहिले नाही. पंतप्रधान मोदी भाषणात खोट्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडे लोकांचे समाधान करण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न मोदींकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लोक फारसं लक्ष देत नाही असंही पवार म्हणाले. 

धर्माच्या आधारे आरक्षण मान्य नाही 

धर्माच्या आधारे आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. हे कुणी केले तर त्याविरोधात संघर्ष करू. आता जातीय जणगणना करण्याची मागणी त्यामागील मुख्य कारणे समाजातील वंचित, शोषित घटकांची संख्या किती, त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानासारख्या व्यक्तीला केरळ, कर्नाटक यासारख्या दक्षिणेकडील राज्यात जास्त प्रतिसाद नाही. लोक त्यांना स्वीकारत नाहीत असं सांगत शरद पवारांनी धर्माच्या आधारे आरक्षणावरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. 

शेती अन् ऊसाबद्दल पंतप्रधान अज्ञानी

एफआरपी ही पद्धत आम्ही सुरू केली, ते मोदींना माहिती नाही. त्यात आपोआप वाढ होत राहते, त्यामुळे त्यात सरकारला भाव ठरवावा लागत नाही. ऊस आणि शेती याबद्दल पंतप्रधानांना मर्यादित ज्ञान आहे असंही शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४