शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 09:07 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला. 

कोल्हापूर - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) ५ वर्षात ५ पंतप्रधान असा जावईशोध नरेंद्र मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा नाही. पुरेसे संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास ५ वर्षात ५ पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला?, आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. १९७७ साली जेपी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला, तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारले जायचे. तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढे आले. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत स्थिर सरकार देत अखंड ५ वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे ५ वर्ष ५ पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय मोदींना समाधान वाटत नाही. त्यांची स्टाईल आहे, कोल्हापूरात आले तर नमस्कार कोल्हापूरकर असं बोलून सुरुवात करणार. पहिले ३-४ वाक्य त्यांचे स्थानिक नेते लिहून देतात ते बोलतात, कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेतले नाही, भाषणात कराडचा उल्लेख केला नाही, सातारचा केला असा टोला शरद पवारांनी लगावला. 

दरम्यान, विदर्भात उमेदवार प्रभावी असून ५० टक्क्यांच्या आत मतदान झालं, लोक उदासीन असतील किंवा आम्हा लोकांच्या कामामुळे अस्वस्थ असतील, अथवा वातावरणामुळेही मतदान कमी झालं असावं. आता मतदानाची टक्केवारी वाढतेय. या देशात अलीकडच्या काळात वास्तवता, सत्य लपवणारा पंतप्रधान पाहिले नाही. पंतप्रधान मोदी भाषणात खोट्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडे लोकांचे समाधान करण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न मोदींकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लोक फारसं लक्ष देत नाही असंही पवार म्हणाले. 

धर्माच्या आधारे आरक्षण मान्य नाही 

धर्माच्या आधारे आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. हे कुणी केले तर त्याविरोधात संघर्ष करू. आता जातीय जणगणना करण्याची मागणी त्यामागील मुख्य कारणे समाजातील वंचित, शोषित घटकांची संख्या किती, त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानासारख्या व्यक्तीला केरळ, कर्नाटक यासारख्या दक्षिणेकडील राज्यात जास्त प्रतिसाद नाही. लोक त्यांना स्वीकारत नाहीत असं सांगत शरद पवारांनी धर्माच्या आधारे आरक्षणावरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. 

शेती अन् ऊसाबद्दल पंतप्रधान अज्ञानी

एफआरपी ही पद्धत आम्ही सुरू केली, ते मोदींना माहिती नाही. त्यात आपोआप वाढ होत राहते, त्यामुळे त्यात सरकारला भाव ठरवावा लागत नाही. ऊस आणि शेती याबद्दल पंतप्रधानांना मर्यादित ज्ञान आहे असंही शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४