शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:10 PM

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित

नाशिक: नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तब्बल पाच तास ही चर्चा सुरू होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महाजन यांनी दिली. यानंतर लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार जे. पी. गावित यांनी यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली.आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून लाँग मार्चला सुरुवात केली. हा मोर्चा 27 तारखेला मुंबईत धडकणार होता. मात्र गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीनं आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या मान्य असल्याचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं. वन हक्क जमिनीचे दावे लवकरात लवकर निकाली काढा, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती. त्यांना सरकारकडून 3 महिन्यात दावे निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर किसान सभेनं मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा यशस्वी झाली. सातबारा कोरा, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदिवासी लाँग मार्च करत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत निघाले होते.