शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 17:59 IST

Kirit Somaiya reaction: उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोचक टिप्पणी करून सोमय्यांना डिवचले होते

Kirit Somaiya reaction on Yamini Yashwant Jadhav and Ravindra Waikar candidature: महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपा विरूद्ध तत्कालीन शिवसेना असा सामना रंगला होता. २०१९ ते जून २०२२ या कालावधीत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जून २०२२ नंतर त्यातील बरेच नेते एकनाथ शिंदेंच्या सोबत भाजपासोबत महायुतीत आले. सोमय्या यांनी आरोप केलेले यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे या तिघांनी मुंबईतून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यावरून ठाकरे गटाने सोमय्या आणि भाजपावर टीका केली होती. त्याला आता सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.

"पंतप्रधान मोदींसाठी आम्ही प्रत्येक मतदाराकडून मत मागणार आहोत. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असे प्रश्न तुम्ही लोक मला विचारत असता; पण हेच प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब या लोकांना विचारण्याची हिंमत दाखवा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे, भारताला पहिल्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविणे याला मी आयुष्यात कधीच समझोता म्हणणार नाही. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश आणि सर्व मतदार हे सध्या पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराकडून आम्ही मोदींसाठी आणि त्यांच्या कामांसाठी मत मागणार आहोत. नकली सेनेच्या नेत्याला तीन महिन्यासाठी पंतप्रधान व्हायचे असेल तर आम्ही समझोता करूच शकत नाही," अशी रोखठोक प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी टीव्हीनाइनशी बोलताना दिली.

"महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील साडे बारा कोटी जनता हेच म्हणताना दिसत आहे की मोदी है तो मुमकीन है. त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी आम्ही प्रचाराच्या रिंगणात उतरलो आहोत, आम्ही फिरतोय आणि फिरणार. अनिल परबांना सांगा की तुमचे मालक उद्धव ठाकरे यांनी सांगावे की ते आणि वायकर पार्टनर होते का? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नंदकिशोर चतुर्वेदींकडून आलेले हवालाचे २०० कोटी कुठे गेले? हे सांगा," असे आव्हान सोमय्या यांनी ठाकरे गटाला दिले.

अनिल परब काय म्हणाले होते?

"किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी होते, पण शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांनी पक्षात घेतले. यशवंत जाधव जशी चौकशी सुरु झाली तेव्हा शिंदे गटात पळाले. या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचाराचे आरोप केलल्या लोकांना मंगळवारी लोकसभेची उमेदवारी दिली. यावरून असा प्रश्न पडतो की, महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला या भ्रष्ट्राचार मान्य होता का? राहुल शेवाळे, यामिनी जाधव, वायकर या सर्वांचे प्रचारप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती केली जाणार का? माझी अशी विनंती आहे की त्यांनाच यांचे स्टार प्रचारक करावे. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला हे उमेदवार मिळाले आहेत. लाखमोलाचे जे उमेदवार महायुतीला मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते. मग किरीट सोमय्या यांनाच या उमेदवारांचा प्रचार करायला लावावा. सोमय्या यांनी हे उमेदवार कसे स्वच्छ आहेत, हे महाराष्ट्राला समजावून सांगावं अशी माझी भाजपा विनंती आहे," असा खोचक टोला परब यांनी भाजपा, सोमय्यांना लगावला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Anil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेRavindra Waikarरवींद्र वायकरYashwant Jadhavयशवंत जाधव