शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल?

By संजय आवटे | Updated: March 2, 2023 14:27 IST

Kasba Peth Assembly By Election Result: धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते.

- संजय आवटेपुण्याचा कसबा मतदारसंघ कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला आहे. लढत चुरशीची होतीच, पण दहा हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

पुण्याचा कसबा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतला तो १९७८ मध्ये. त्यानंतर अरविंद लेले, गिरीश बापट, मुक्ता टिळक हे भाजपचे आमदार होते. १९८५ ची निवडणूक आणि १९९१ ची पोटनिवडणूक वगळता भाजपचेच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गिरीश बापट पाचवेळा इथे आमदार होते.

यावेळी भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला. या पोटनिवडणुकीत 'सहानुभूती' हा मुद्दा नव्हता. ब्राह्मण उमेद्वार असता, तर धंगेकरांचे मताधिक्य वाढले असते. कारण, थेट ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी लढत झाली असती. कसब्याचा चेहरा खास पुणेरी असला तरी इथे ब्राह्मण मतरादारांचे प्रमाण चौदा टक्क्यांहून अधिक नाही. गिरीश बापट सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय होते. तसा उमेद्वार आता भाजपकडे नव्हता. याउलट कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर हे अत्यंत लोकप्रिय आहेत. ते मूळचे शिवसेनेचे. मग मनसेत गेले. यापूर्वी तीन निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. त्यांचा सर्वपक्षीय संपर्क आहे. आजवर भाजप निवडून आले, त्यामध्ये तिरंगी वा चौरंगी लढतींचा वाटाही मोठा होता.

यावेळी विरोधकांनी एकच उमेद्वार दिला. महाविकास आघाडीने ही निवडणूक 'आघाडी' म्हणून लढवली. सर्व विरोधक एकवटले होते. मुख्य म्हणजे, प्रचाराची व्यूहरचना प्रभावी होती. त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांचा खुबीने वापर झाला. गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक संस्था-संघटनांशी धंगेकरांचा उत्तम 'कनेक्ट' असल्याचा फायदा झाला.

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाकडे गेली आणि चिन्हही गेले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक. ठाकरे गटाविषयी असणा-या सहानुभूतीचे दर्शन आदित्य यांच्या 'रोड शो'मध्ये झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळ ठोकल्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर मतदानापूर्वी झाले. धार्मिक मुद्दे आले. मात्र, ते चालले नाहीत.

धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते. निकाल कसब्याचा असला तरी त्यामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणाला नवे संकेत मिळाले आहेत. त्यातून विरोधकांचे मनोधैर्य वाढणार आहे आणि भाजपला बरेच 'चिंतन' करावे लागणार आहे.

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठcongressकाँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी