शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

कमला मिलच्या आगीसाठी मनपाच जबाबदार; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 5:10 PM

कमला मिलमधील हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे केली.

मुंबई - कमला मिलमधील हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे केली. या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवावी आणि आयुक्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी स्पष्ट मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.राजभवन येथे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, आ.प्रा. जनार्दन चांदूरकर, आ.सुनिल केदार. आ. अस्लम शेख, मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आदींचा प्रामुख्याने समावेश होता. या शिष्टमंडळाने तब्बल 40 मिनिटे मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराची इत्यंभूत माहिती राज्यपालांना दिली.यावेळी विखे पाटील म्हणाले की,  कमला मील कंपाऊंडमधील ह्यमोजोज बिस्ट्रोह्ण आणि ह्यवन अबव्हह्ण या दोन हॉटेल्सला आग लागून 14 निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या घटनेसाठी मुंबई महानगर पालिका जबाबदार आहे. मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरूद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्नीशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे.महानगर पालिकेच्या भ्रष्ट, निष्क्रिय व उदासीन कारभारामुळेच कधी आग लागून तर कधी इमारत कोसळून निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, असे सांगून विरोधी पक्षनेत्यांनी मागील वर्षभरात घडलेल्या अनेक घटना राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्या. कमला मील व साकिनाका येथील फरसाण मार्टची आग व त्याचप्रमाणे घाटकोपर व भेंडीबाजार येथील इमारत कोसळण्याच्या चार घटनांमध्ये तब्बल 76 बळी गेले आहेत. या मृत्युंसाठी केवळ पालिकेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याने आयुक्तांसह सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर भादंविच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.अनधिकृत हॉटेल्सविरूद्ध कारवाई न करण्यासाठी आपल्याला एका राजकीय नेत्याचा फोन आल्याचे महापालिका आयुक्त जाहीरपणे सांगतात. परंतु, त्या नेत्याचे नाव मात्र ते उघड करत नाहीत. सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून मनपा आयुक्त स्वतःच्या अधिकारात नियमबाह्यपणे रूफटॉप रेस्टॉरेंटचे धोरण निश्चित करतात. कमला मीलची घटना घडल्यानंतर निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी तातडीने अतिक्रमण तोडण्याची कारवाई केली जाते. यावरून शहरात कुठे अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामे आहेत, याची मनपाला संपूर्ण माहिती असल्याचे सिद्ध होते. या पार्श्वभूमीवर कमला मीलच्या आगीसाठी आयुक्त जबाबदार असल्याचे दिसून येत असतानाही राज्य सरकार त्यांच्याकडेच या घटनेच्या चौकशीची जबाबदारी देते, हे अत्यंत चुकीचे व संशयास्पद आहे. राज्य सरकार आयुक्तांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या घटनेची या चौकशी सीबीआयला सोपविण्याबाबत आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली.कमला मील, रघुवंशी मील, फिनिक्स मील, टोडी मीलसह शहरातील सर्वच मीलमधील इमारती व तेथील व्यवसायांच्या परवान्यांची देखील सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी याप्रसंगी केली. आयुक्तांच्या गैरकारभाराविरोधात आणि या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यासाठी पीडीत कुटुंबांनी न्यायालयात दाद मागितली आहे. सरकार न्याय द्यायला तयार नसल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्यावर देखील न्यायालयात जाण्याची वेळ ओढवल्याचे विखे पाटील यांनी राज्यपालांना सांगितले.मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही महानगर पालिकेत सुरू असलेल्या गैरकारभाराची पोलखोल केली. ते म्हणाले की, मुंबई शहरातील अनेक मिलमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून, त्यासंदर्भात मनपाकडून नियमबाह्यपणे परवाने दिले आहेत. हे सर्व उद्योग पालिका आयुक्तांच्या निर्देशांवरूनच होत आहेत. किंबहुना एखाद्या भूखंडाच्या नियोजित वापरात बदल करण्याचे अधिकार फक्त आयुक्तांनाच आहेत आणि संपूर्ण मुंबई शहरात नियोजित वापरात बदल करून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे कमला मीलच्या आगीसाठी आयुक्तच दोषी आहेत. व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली परवाने देण्याचे अधिकार मनपाकडे केंद्रीत झाले असून, अग्नीशमन व पोलिस विभागाचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा व्यवसायांवरील नियंत्रण कमी होऊन मागील वर्षभरात शहरात आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही निरूपम यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. ग्राहकांनी अनधिकृत हॉटेल्समध्ये न जाण्यासंदर्भात आयुक्तांनी केलेल्या आवाहनावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करून तसे असल्यास मुंबई महापालिकेने सर्वप्रथम अनधिकृत हॉटेल्सची यादी जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.आ.प्रा. जनार्दन चांदूरकर, रवी राजा, सचिन सावंत, आ. सुनिल केदार, चरणजितसिंग सप्रा आदींनीही यावेळी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची माहिती राज्यपालांना दिली. या शिष्टमंडळात माजी आमदार मधू चव्हाण, अशोक जाधव, अलकाताई देसाई, सुधा जोशी, भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, रशिद ताहिर मोमिन आदी नेतेही सहभागी होते.मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा,यांचे जनसंपर्क कार्यालय

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलKamala Mills fireकमला मिल अग्नितांडव