शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:43 IST

तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ठाणे - मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर महाराष्ट्रात काय रिएक्शन येईल. मी तर मुख्यमंत्र्यांहून छोटा कार्यकर्ता आहे. मलाही मानणारे ४ लोक आहेत. तुमचा असा फोटो टाकला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. मी माणूस नाही का? त्यामुळे एखादी बाजू मांडताना बाकीच्या बाजूही विचारात घ्यायच्या असतात असा टोला माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्याचसोबत राज्य सरकार आपल्याविरोधात असेल तर आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे जेव्हा मानसिकदृष्ट्या तयारी असते तेव्हा जेलचे दरवाजे आणि लोखंडी सळ्या काय वाटत नाही. मी खून, बलात्कार केला नाही असं आव्हाडांनी म्हटलं.  

जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेंना केलेल्या मारहाण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत राज्य सरकारला त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी सांगितले होते. तेव्हा राज्य सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी द्या किंवा सीबीआय द्या आमचं काही म्हणणं नाही सांगितले. त्यावर न्यायाधीशही हसले असं आव्हाडांनी माहिती दिली. सुनावणीबाबत आव्हाड म्हणाले की, हा गुन्हा घडून पावणे तीन वर्ष झाली. चार्जशीट कोर्टात दाखल झालीय. सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिलंय. निकाल जाहीर झाला आहे. जो तपास झाला तो चुकीचा होता, त्यात त्रुटी राहिल्यात असं काहीतरी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगावं लागेल. सरकार बदलतात पण पोलीस बदलत नाही. पोलिसांनी खोटं काम केले असं जर सर्वोच्च न्यायालयात असं म्हटलं गेले तर त्याचे दूरगामी परिणाम मला अडकवण्यासाठी होतंय असं होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच सुप्रीम कोर्टात वकिलांनी ७२ तासांच्या गुन्ह्याचाही उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड गुंड आहे तर होय, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सिनेमा बंद करणारा गुंड आहे. शिवाजी महाराजांसाठी गुंडगिरी मला चालेल. इतिहासाची विकृतीकरण होऊ देणार नाही. जो करेल त्याला भोगावं लागेल असं त्यांनी सांगितले. राज्य सरकारचं म्हणणं हास्यास्पद होते. स्वत: न्यायाधीशही हसले. हे राज्य सरकार कसं मागे लागले. कोण मागे आहे ते अख्खं ठाण्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. मला इतकं गांभीर्याने घेतलंय त्याचे कौतुक वाटते. काही होईल. १ महिना जेलमध्ये राहावं लागेल असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

दरम्यान, तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल. एखादा माणूस ४ वर्ष माझा पाठलाग करतात. माझे नागडे फोटो टाकतो. उच्च न्यायालय स्वत: म्हणतं हा माणूस खोटारडा आहे. याने अनेक गोष्टी लपवून ठेवल्यात असं निरीक्षण अनंत करमुसेबद्दल न्यायाधीशांनी मांडले आहे. करमुसेने पहिला एफआयआर दिला तो सगळ्यांसमोर आहे. त्याच्यानंतर त्याला कोण कोण काय काय बोलले मला सगळं माहिती आहे. १० दिवसांनी स्टेटमेंट बदलतो तो विचार करून केलेला असतो. हायकोर्टानं करमुसेचे म्हणणं खोटे असल्याचं म्हटलंय. तो कुणाच्या बंगल्यावर जातो. बैठकीला हे माहिती आहे असं सांगत आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय