शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:43 IST

तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ठाणे - मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर महाराष्ट्रात काय रिएक्शन येईल. मी तर मुख्यमंत्र्यांहून छोटा कार्यकर्ता आहे. मलाही मानणारे ४ लोक आहेत. तुमचा असा फोटो टाकला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. मी माणूस नाही का? त्यामुळे एखादी बाजू मांडताना बाकीच्या बाजूही विचारात घ्यायच्या असतात असा टोला माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्याचसोबत राज्य सरकार आपल्याविरोधात असेल तर आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे जेव्हा मानसिकदृष्ट्या तयारी असते तेव्हा जेलचे दरवाजे आणि लोखंडी सळ्या काय वाटत नाही. मी खून, बलात्कार केला नाही असं आव्हाडांनी म्हटलं.  

जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेंना केलेल्या मारहाण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत राज्य सरकारला त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी सांगितले होते. तेव्हा राज्य सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी द्या किंवा सीबीआय द्या आमचं काही म्हणणं नाही सांगितले. त्यावर न्यायाधीशही हसले असं आव्हाडांनी माहिती दिली. सुनावणीबाबत आव्हाड म्हणाले की, हा गुन्हा घडून पावणे तीन वर्ष झाली. चार्जशीट कोर्टात दाखल झालीय. सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिलंय. निकाल जाहीर झाला आहे. जो तपास झाला तो चुकीचा होता, त्यात त्रुटी राहिल्यात असं काहीतरी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगावं लागेल. सरकार बदलतात पण पोलीस बदलत नाही. पोलिसांनी खोटं काम केले असं जर सर्वोच्च न्यायालयात असं म्हटलं गेले तर त्याचे दूरगामी परिणाम मला अडकवण्यासाठी होतंय असं होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच सुप्रीम कोर्टात वकिलांनी ७२ तासांच्या गुन्ह्याचाही उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड गुंड आहे तर होय, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सिनेमा बंद करणारा गुंड आहे. शिवाजी महाराजांसाठी गुंडगिरी मला चालेल. इतिहासाची विकृतीकरण होऊ देणार नाही. जो करेल त्याला भोगावं लागेल असं त्यांनी सांगितले. राज्य सरकारचं म्हणणं हास्यास्पद होते. स्वत: न्यायाधीशही हसले. हे राज्य सरकार कसं मागे लागले. कोण मागे आहे ते अख्खं ठाण्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. मला इतकं गांभीर्याने घेतलंय त्याचे कौतुक वाटते. काही होईल. १ महिना जेलमध्ये राहावं लागेल असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

दरम्यान, तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल. एखादा माणूस ४ वर्ष माझा पाठलाग करतात. माझे नागडे फोटो टाकतो. उच्च न्यायालय स्वत: म्हणतं हा माणूस खोटारडा आहे. याने अनेक गोष्टी लपवून ठेवल्यात असं निरीक्षण अनंत करमुसेबद्दल न्यायाधीशांनी मांडले आहे. करमुसेने पहिला एफआयआर दिला तो सगळ्यांसमोर आहे. त्याच्यानंतर त्याला कोण कोण काय काय बोलले मला सगळं माहिती आहे. १० दिवसांनी स्टेटमेंट बदलतो तो विचार करून केलेला असतो. हायकोर्टानं करमुसेचे म्हणणं खोटे असल्याचं म्हटलंय. तो कुणाच्या बंगल्यावर जातो. बैठकीला हे माहिती आहे असं सांगत आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय