शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:30 IST

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

मुंबई: मराठी चित्रपट 'हर हर महादेव' याचे शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला, पण आव्हाडांविरोधात एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

'खुनाचा गुन्हा चालला असता, पण...'विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी आव्हाड म्हणाले की, 'माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणात मला विनाकारण कोठडीत ठेवलं. कालचाही प्रकार अतिशय चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं मान्य करेन पण 354(विनयभंग) आणि 376, यासाठी माझा जन्म झालेला नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण हे मला सहन होत नाही,' असं म्हणत आव्हाड भावूक झाले.

'राजकारणात राहायचं नको'आव्हाड पुढे म्हणाले की, 'ही गोष्ट माझ्या काळजाला लागली आहे. माझ्यावर इतर कोणताही आरोप केला असता तर चालला असता, पण 354 मला मान्यच नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला गेला. मी आयुष्यात असं काही करू शकत नाही. हा मोठ्या कटाचा भाग आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये. ही कारवाई माझ्या मनाला लागली आहे. त्यापेक्षा राजकारणात राहायचं नको,' असंही आव्हाड म्हणाले.

जयंत पाटील काय म्हणाले?जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे की, काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या. मुख्यमंत्री गाडीत असताना, पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त असताना विनयभंग कसा होईल? मनात राग ठेऊन सरकारने ही कृती केली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं, गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं,' असं पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील