शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

“राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:31 IST

नवनिर्वाचित नगरसेवकांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सांगली: राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित मतेही मिळाली. एवढेच नव्हे तर एका अपक्षाचे अधिकचे मत मिळाले. यानंतर आता एका पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे उभे आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही, असे म्हटले आहे. 

सांगली जिल्ह्यातील खानापूरमधील एकेकाळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते राहिलेले आणि वसंतदादा पाटील यांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील बोलत होते. खानापूर नगरपंचायतीच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या पक्षात आला आहात, असे मानू नका. राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेसच्या विचारावरच, तत्त्वावर चालतो, असा सल्ला पक्ष प्रवेश केलेल्यांना जयंत पाटील यांनी दिला.

पण आम्ही जिद्द सोडली नव्हती

विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीमध्ये कुणीही पक्षप्रवेश करत नव्हते. याऊलट पेपर वाचला की, राष्ट्रवादीमधून काहीजण बाहेर गेले. काही जण जाणार आहे आणि काही जणांची शक्यता आहे, अशा बातम्या वाचायला मिळायच्या, पण आम्ही जिद्द सोडली नव्हती.  शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी झंझावती दौरे महाराष्ट्रभर सुरू केले. त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण बदलून गेले. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या. जवळपास शंभर जागांच्या जवळ दोन्ही पक्षाला यश मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणात काहीही होऊ शकते, त्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाला, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, संपतराव माने हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते म्हणून त्याकाळी ओळखले जायचे. खानापूर तालुक्याचे दोनवेळा ते आमदार झाले होते. सांगलीत काँग्रेस वाढविण्यात संपतराव माने यांचे कार्य मोलाचे राहिले. वसंतदादांचे नातू आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपतराव माने यांच्या वारसदारांचे सख्य होते. मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेस पक्षामधून डावलले जात असल्याचा नाराजीतून आता संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केल्याने खानापूर भागातील काँग्रेसबरोबरच वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा गट ही फुटला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSangliसांगली