शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:30 IST

Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, तत्पूर्वी हनुमान चालिसावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. राणा दाम्पत्याला विश्वासू सहकारी गळाला लावून करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी सपना ठाकूर यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. संघटनात्मक आढावा दौऱ्याच्या निमित्ताने पाटील राज्यातील विभाग पिंजून काढत आहेत. अमरावतीत राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याने तिथे ताकद वाढवणे हे आपल्यासमोरचे आव्हान असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल

अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात याबाबत मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, राजकारणात वेळ फार महत्त्वाचा, लोक राजकारणात आयुष्य घालवतात त्यामुळे वेळेचा उपयोग करून पक्षाच्या आणि आपल्या प्रगतीचा विचार आपण करायला हवा. लोकांना विषय समजून सांगा तरच लोकांचे प्रबोधन होईल आणि एक जन आंदोलन उभे राहील. येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्न करा. आपल्यात अचूक नियोजन पाहिजे, एकसंधपणा पाहिजे तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRavi Ranaरवि राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाJayant Patilजयंत पाटील