शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:30 IST

Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, तत्पूर्वी हनुमान चालिसावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. राणा दाम्पत्याला विश्वासू सहकारी गळाला लावून करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी सपना ठाकूर यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. संघटनात्मक आढावा दौऱ्याच्या निमित्ताने पाटील राज्यातील विभाग पिंजून काढत आहेत. अमरावतीत राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याने तिथे ताकद वाढवणे हे आपल्यासमोरचे आव्हान असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल

अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात याबाबत मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, राजकारणात वेळ फार महत्त्वाचा, लोक राजकारणात आयुष्य घालवतात त्यामुळे वेळेचा उपयोग करून पक्षाच्या आणि आपल्या प्रगतीचा विचार आपण करायला हवा. लोकांना विषय समजून सांगा तरच लोकांचे प्रबोधन होईल आणि एक जन आंदोलन उभे राहील. येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्न करा. आपल्यात अचूक नियोजन पाहिजे, एकसंधपणा पाहिजे तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRavi Ranaरवि राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाJayant Patilजयंत पाटील