शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

सैनिक जखमी होताना भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:25 PM

Kargil Vijay Diwas : कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी सांगितला कारगिलचा अनुभव

ठळक मुद्देकारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होतेकारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होतेकारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते, या काळात कुणीही सुरक्षित नसायचे,

सोलापूर : युद्ध सुरू असताना सौनिकांवर औषधोपचार व त्यांची सेवा केली. त्या काळातील आमचा अनुभव तसा वाईट होता. कारण आमच्या डोळ्यांसमोर आमचे सैनिक जखमी झालेले आम्ही पाहत होतो. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवून काम करणे आमच्यासाठी गरजेचे होते, असा अनुभव मार्तंड दाभाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितला.

कारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होते. जखमी झालेल्या सैनिकांवर आम्ही प्रथमोपचार करत होतो. सैनिकांची प्रकृती खराब असेल तर त्याला हेलिकॉप्टरने श्रीनगर किंवा दिल्ली येथील रुग्णालयात पाठवत होतो. कधी कोणत्या परिस्थितीत आपला सौनिक येईल, हे सांगता येत नसायचे. जो समोर येईल त्याच्यावर प्रथमोपचार करणे हेच हाती असायचे. पुढील उपचारासाठी उधमपूर किंवा दिल्ली येथे सैनिकास पाठविल्यानंतर त्याचे काय झाले, हे आम्हाला कळायचे नाही. कुणाचा हात तर कुणाचा पाय धडापासून वेगळा झालेला असायचा. अशा रुग्णांवर विशेष प्रथमोपचार करावा लागायचा. रक्त वाहण्याचे थांबविणारे बँडेज व वेदना कमी करण्याचे इंजेक्शन यांचा जास्त वापर होत होता, असे मार्तंड दाभाडे यांनी सांगितले. 

ते आता सोलापुरातील सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक म्हणून काम करत आहेत. सैन्यात ३० वर्षे सेवा केल्याबद्दल त्यांना मानद कॅप्टन ही पदवी देण्यात आली आहे. ते मूळचे नाशिक येथील आहेत.

कारगिलमध्ये बॉम्बिंग नेहमीच व्हायचे..कारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होते. कारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते. या काळात कुणीही सुरक्षित नसायचे, असा अनुभव कारगिल येथे सैन्याला रसद पुरविण्यासाठीचे कार्यालयीन काम करणाºया गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितला. कारगिलपासून मुंजीगाव येथे आम्हाला जावे लागायचे. तेथून सात किलोमीटर अंतरावर पाकिस्तान दिसत होता. हा परिसर मोकळा असल्याने एखादा माणूसही सहज दिसत होता. त्यामुळे लगेच गोळीबार केला जात होता. पुढे लढणाºया सैनिकांना सक्षम ठेवणे, त्यांना रसद पुरविणे, रेशन (राशन) पुरवणे आदी आमचे काम होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. गुरुनाथ कुलकर्णी हे सध्या सौनिक कल्याण कार्यालय येथे लिपिक म्हणून काम करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तान