शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बिंग फुटेल म्हणूनच एनआयएकडे तपास : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 13:31 IST

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता, तर आधीच केंद्राकडे का नाही दिला ?

ठळक मुद्देपरिषद आणि दंगल हे दोन्ही वेगळे मुद्देशरद पवार यांच्या भूमिकेचे स्वागत

धनाजी कांबळे - पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी महाविकास आघाडीने फेरआढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु केल्यावर अचानक केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला आहे. फडणवीस सरकारचे बिंग फुटेल, या भीतीतूनच घाईघाईने त्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.भीमा कोरेगावची दंगल पूर्वनियोजित पद्धतीने घडविण्यात आली आहे. विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक येथे येणार याची कल्पना सरकारला होती. मात्र, पुरेशी खबरदारी न घेता दंगलखोरांना रान मोकळे सोडले गेले. दंगल नियंत्रण किंवा दंगलखोरांना तत्काळ अटक करण्याऐवजी हाकेच्या अंतरावर एका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईबाबत कोणताच आदेश दिला नव्हता, याकडे अ‍ॅड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो, या दंगलीमागे मास्टरमाइंंड दुसराच आहे. संभाजी उर्फ मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तरीही केवळ मिलिंद एकबोटे यांना अटक करून कारवाई केल्याचे दाखवण्यात आले. मात्र, थेट नरेंद्र मोदींचा आशीर्वाद असल्याने भिडे यांना पोलीस आणि सरकारने चौकशीसाठीही बोलावले नाही. यातून पोलीस दबावाखाली काम करीत होते, हे उघड आहे. सरकारमधील लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याचे स्पष्टपणे दिसत होते. निष्पक्ष तपास झाला असता, तर निश्चितपणे दंगलीमागचे खरे चेहरे समोर आले असते. मात्र, जाणीवपूर्वक या प्रकरणाचा तपास कुणीतरी ठरवून दिलेल्या स्क्रिप्टनुसार करण्यात आला. त्यात सामाजिक कार्यकर्त्यांना गोवण्यात आले, असेही ते म्हणाले.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, दहशतवादी हल्ल्याप्रमाणे येथे आलेल्या नागरिकांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यावेळी फडणवीस सरकारला हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, हे लक्षात आले नव्हते का? आता अचानक हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनवून तपास एनआयएकडे देणे म्हणजे फडणवीसांना वाचविण्याची आणि बिंग फुटू नये, यासाठी खेळलेली ही राजकीय खेळी आहे. फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी त्याचवेळी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे द्यायला हवा होता. तसे त्यांनी केले नाही.

 

परिषद आणि दंगल हे दोन्ही वेगळे मुद्देदंगलीचा तपास भरकटवण्यासाठीच दोन्ही मुद्द्यांची सरमिसळ करण्यात आली. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव येथील दंगल हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. त्याचा परस्पराशी संबंध नाही. मात्र, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांवर हल्ला केला असे दाखवण्यात आले. जे आजही होत आहे. जेएनयूमध्ये तोंड लपवून आलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मात्र, हल्ल्यात जे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे भाजपची सुरुवातीपासूनची क्रोनॉलॉजी समजून घ्यायला हवी. दंगल प्रकरणात पोलिसांनी ज्यांना अटक केलेली आहे, ते एल्गार परिषदेशी संबंधित नाहीत. पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. पण, पोलिसांनी पकडलं म्हणून काही कार्यकर्ते तुरूंंगात आहेत. त्यांना नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आलेली आहे, ते तुरूंगातच सडणार का?, असा सवालही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

शरद पवार यांच्या भूमिकेचे स्वागतराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच मी स्वागत करतो. हे प्रकरण केंद्राने एनआयएकडे दिले आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून अविश्वासच आहे. शिवसेनेने प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल. राज्य सरकारची परवानगी न घेता मनमर्जीने तपास स्वत:कडे घेणे ही बाब राज्य सरकारांच्या अधिकारांचे हनन करणारी आहे. तरीही राज्य सरकारने स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहोत. - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा