शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

संस्थानकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 1:22 AM

भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत.

भोर : भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यात झाडे उगवली असून, पुलावरून गाडी गेल्यावर पूल हलतो. या पुलावरून चारचाकी गाडी पडून झालेल्या अपघातात चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. महाड-पंढरपूर रस्त्यावरील आंबेघर येथील नीरा नदीवर संस्थानकाळात हा दगडी पूल १९३५ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यावर राज्यमार्ग असून, कोकणात जाणारा हा एकमेव मार्ग आहे.नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोड व महाड रोडवरील दोन्ही बाजूंकडील लोक याच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनांची सतत गर्दी असते. पुलाच्या बांधकामानंतर ८० वर्षांत कोणत्याच प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.त्यामुळे पुलाचे सरंक्षक कठडे तुटलेले असून, दगडी पिलर खराब झाले आहेत. पुलावरून वाहने गेल्यावर पूल थरथरतो. कठडे खराब असल्याने गेल्या वर्षी पहाटे चारचाकी गाडी पुलाववरून नदीपात्रातील पाण्यात पडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी केली; मात्र चारचाकी ज्या ठिकाणावरून पडली तेथे संरक्षक कठडे न बसवता इतर ठिकाणी कठडे बसविले. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो. ( वार्ताहर)