शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

फटाक्यांच्या आवाजाची पाहणी करा

By admin | Updated: October 17, 2014 00:20 IST

दिवाळीचे वेध लागते तसे फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाची ही चाहूल लागतेच. यंदा या ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता हरित न्यायाधिकरणामुळे निर्माण झाली आहे.

पुणो : दिवाळीचे वेध लागते तसे फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाची ही चाहूल लागतेच. यंदा या ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता हरित न्यायाधिकरणामुळे निर्माण झाली आहे. फटाके विक्री करणारी दुकाने, फटाक्यांचा व्यापार करणा:या कंपन्यांना, उत्पादकांच्या गोदामांना अचानक भेटी देण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिका:यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय फटाके विरोधी समिती स्थापन करण्याचे आदेश राष्ट्रिय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. या समित्यांना चायना मेड फटके आढळल्यास किंवा चायानमेड फटाक्यांचा साठी दिसल्यास ते तातडीने जप्त करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
राष्ट्रिय हरित न्यायाधिकरणचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले. भारतामध्ये फटाके उडविण्यावर बंदी आणावी यासंदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रविन्द्र भुसारी यांनी अॅड असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. फटाक्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण; बालमजुरी, अपघात, मानवी शरिराचे विकृतीकरण याबाबत न्यायाधिकरणासमोर मांडण्यात आले. याविरोधात कायद्याची अंमलबजावणी करणा:या यंत्रणा कोणतेही परिणामकारक पाऊल उचलताना दिसत नाही असा आरोप याचिकेतून केला आहे. 
याबाबत न्यायाधिकरणाने आदेशात सांगितले की,  समितीने सुतळी बॉम्ब, सेव्हन शॉट बॉम्ब किंवा अतिआवाज करारे फटाके यांच्यामुळे होणा:या ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप समितीने करावेव अशा फटाक्यांचा, चायनामेड फटाक्यांचा साठी पंचनामा करून जप्त करावा, यासंदर्भातील कारवाई ज्वालाग्राही वस्तू विभागाने करावी. 
 
कोण आहे या समितीत?
महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी, ज्वालाग्राही वस्तू विभागाचे प्रमुख, स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस हवालदार.
विजयी उमेदवारांसाठी.
निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी आपला आनंदोत्सव पर्यावरणहित लक्षात ठेवून साजरा करावा. आता आपल्या विजयाचे दिखावू प्रदर्शन मांडण्याची पद्धत बंद होणो ही काळाची गरज आहे. आपण सभ्य, सुशिक्षित समाजाचे घटक आहोत याची जाणिव होणो आवश्यक आहे. समाजाकडून निवडून दिलेल्या व्यक्तिंनी याबाबत योग्य संदेश समजून घेण्याची गरज आहे.