शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:10 IST

हे सिंधू, मी तुला विसरणार नाही, मग मी वेडा ठरेन अगर भविष्यवादी ठरेन असं वीर सावरकर म्हणाले होते. या त्यांच्या स्मरणातील उद्गाराने आम्ही व्यथित झालो असा खोचक टोला ठाकरे गटाने भाजपाला लगावला आहे.

मुंबई - भारतीय सैन्याने युद्धात आपल्या वीरांचे बलिदान दिले, नागरिकांनी प्राण गमावले, पण हाती काय पडले? पाकव्याप्त काश्मीर द्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ही बातमी आली. ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत. पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडले? हाच प्रश्न वीर सावरकरांचा आत्माही विचारत असेल. सावकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न आताच साकार झाले असते. मोदी आणि त्यांच्या लोकांनी ही संधी गमावली अशा शब्दात उद्धवसेनेकडून सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

त्याशिवाय मोदी आणि त्यांच्या लोकांना वीर सावरकरांचे स्वप्नही साकारता आले नाही आणि गोडसेच्या अस्थीही विसर्जित करता आल्या नाहीत. आम्ही सावरकरांच्या कल्पनेतील अखंड भारत अस्तित्वात आणू या वल्गनाच ठरल्या. हे सिंधू, मी तुला विसरणार नाही, मग मी वेडा ठरेन अगर भविष्यवादी ठरेन असं वीर सावरकर म्हणाले होते. या त्यांच्या स्मरणातील उद्गाराने आम्ही व्यथित झालो. आम्हाला याक्षणी वीर सावरकरांच्या अंत:करणातील खोल खोल ध्येयवादाची मूर्ती दिसते ती आजच्या राजकीय कोलाहलात, निवडणुकांच्या घोषणांत, व्यापारात मावण्यासारखी किंवा रेखाटण्यासारखी नाही. युद्ध थांबवण्याआधी पाकच्या ताब्यातील काश्मीर तरी घ्यायला हवे होते असंही उद्धवसेनेने म्हटलं.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा जहाल मंत्र वीर सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात दिला होता, पण नकली सावरकर भक्तांनी अखंड भारतासाठी लढणाऱ्या सैन्याच्या हातातील बंदुका म्यान करायला लावल्या. अखंड हिंदू राष्ट्र कोणी दान देणार नाही. ते लढून, युद्ध करूनच मिळवावे लागणार आहे.

जो कोणी सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीस आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू आहे अशी सावरकरांची व्याख्या होती. वीर सावरकर हे अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह, महाराष्ट्रातले सत्ताधारी लोक हे वीर सावरकरांच्या अखंड विचारांचे समर्थक होते, पण तो अखंड विचार दृष्टिक्षेपात येत असताना या सर्व लोकांनी कच का खाल्ली? हे एक गौडबंगालच म्हणायला हवे.

मोदी काळात गोडसे विचारांना मान्यता मिळाली, गोडसेच्या जयंत्या मयंत्याही साजऱ्या होत आहेत पण अचानक युद्धविराम मान्य न करता युद्ध आणखी चार दिवस पुढे नेले असते तर काश्मीर, लाहोर, कराची पाडून भारतात जोडता आले असते व गोडसेच्या अस्थींचेही विसर्जन करता आले असते आणि ते पुण्यही मोदी भक्तांनी गमावले.

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मिळवणे हे आमचे लक्ष्य आङे. आधी पीओके आमच्या ताब्यात द्या मगच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते अशा शब्दांत मोदींनी ठणकावले पण त्यांनी नक्की कोणाला व कधी ठणकावले याचा तपशील नाही. 

भाजपा आणि त्यांच्या लोकांनी प्रे. टम्प यांचे पुतळे अमेरिकन वकिलातीसमोर जाळायला हवेत. काश्मीरपासून रामेश्वरपर्यंत, सिंधपासून आसामपर्यंत एक आणि अविभाज्य भारताची संकल्पना वीर सावरकरांनी मांडली होती. पंतप्रधान मोदी व त्यांचे लोक वीर सावरकरांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असतात.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर