शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:08 IST

'शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे.'

Mohan Bhagwat on Iran Crisis: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जगात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे. नागपूर येथे विश्व हिंदू परिषद कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

संघर्षांचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना

भागवत यांनी जागतिक संघर्षांच्या मुळाशी स्वार्थ आणि वर्चस्व गाजवण्याची मानसिकता असल्याचे सांगितले. याच कारणामुळे जगभरात युद्धे आणि संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणतात, गेल्या दोन हजार वर्षांपासून जग विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात विशेष यश मिळालेले नाही. धार्मिक असहिष्णुता, जबरदस्ती धर्मांतर आणि श्रेष्ठत्व-हीनत्वाच्या भावना आजही अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले.

bभागवत यांनी ठामपणे सांगितले की, सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धांना थांबवण्याची क्षमता भारतात आहे. संघर्षात अर्थ नाही, समन्वयातच खरा अर्थ आहे. भारताची ‘सर्व एक आहेत’ ही प्राचीन परंपरा जगाला सौहार्दाचा मार्ग दाखवू शकते. मात्र, त्यासाठी देशात धर्माचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धर्म म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, आचरणही महत्त्वाचे

आरएसएस प्रमुखांनी धर्माच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, धर्म हा केवळ शास्त्रांपुरता मर्यादित नसून, तो लोकांच्या आचरणातही दिसला पाहिजे. अनुशासन आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मानवतेचा दृष्टिकोन भारताची ओळख

भागवत यांनी सांगितले की, भारत मानवतेच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, तर इतर अनेक देश शक्ती आणि वर्चस्वाला अधिक महत्त्व देतात. भारताचे संविधान आणि सांस्कृतिक वारसा हीच विचारसरणी प्रतिबिंबित करतात.

संघर्षाऐवजी सौहार्दाची गरज

जग सध्या विनाशाच्या दिशेने जात असल्याची चिंता व्यक्त करत भागवत म्हणाले की, आजच्या परिस्थितीत संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. आधुनिक विज्ञानही हळूहळू ‘सर्व एक आहेत’ या विचाराकडे झुकत असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India can prevent war, unite world: Mohan Bhagwat's statement.

Web Summary : Mohan Bhagwat believes India can halt global conflicts through unity and values. He emphasized that selfishness fuels wars and that India's tradition of oneness can bring harmony if dharma is practiced. He highlighted the importance of character, not just scriptures, for global peace.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर