इंडिया आघाडी मुंबईतील सभेतून फुंकणार शंखनाद, १७ तारखेला मुंबईत न्याय यात्रेचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:50 PM2024-03-08T13:50:34+5:302024-03-08T13:51:01+5:30

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदुरबार ...

India Aghadi will blow conch shell from a meeting in Mumbai, Nyaya Yatra will conclude in Mumbai on 17th | इंडिया आघाडी मुंबईतील सभेतून फुंकणार शंखनाद, १७ तारखेला मुंबईत न्याय यात्रेचा समारोप

इंडिया आघाडी मुंबईतील सभेतून फुंकणार शंखनाद, १७ तारखेला मुंबईत न्याय यात्रेचा समारोप

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदुरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, १७ मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. याच सभेत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत म्हणून ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत, अशी टीका पटोले यांनी यावेळी केली. 
 

Web Title: India Aghadi will blow conch shell from a meeting in Mumbai, Nyaya Yatra will conclude in Mumbai on 17th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.