शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:36 IST

महामंडळांच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना प्रवीण दरेकर यांनी कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची महाविकास आघाडी सरकारवर टीकाकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीराज ठाकरे यांच्या पत्राचे प्रवीण दरेकरांकडून स्वागत

मुंबई : भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या महामंडळांच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना प्रवीण दरेकर यांनी कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली आहे. (an independent development corporation for konkan demands bjp leader pravin darekar)

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करत कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाचे आहेत. शिवसेनेलाही कोकणाने खूप दिले आहे. आता कोकणाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ: अजित पवार

कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम

कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केली. शिवसेना आता फक्त मुंबई आणि कोकणपुरतीच आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

नाणार प्रकल्पात आडकाठी करू नये

नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासंदर्भात भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, नाणारमुळे कोकणाचा मोठा विकास होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आडकाठी करू नये. मोठा रोजगार उपलब्ध होणार असेल, तर त्यांनी आपली भूमिका बदलावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचे स्वागत केले आहे. 

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :konkanकोकणpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्पBJPभाजपाShiv Senaशिवसेना