शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

जिजाऊ... पोटचा गोळा स्वराज्याला अर्पण करणारी माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 11:20 IST

‘शिवबा’ ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा यशस्वी प्रवास घडवला, तो मातृत्वात गुरुत्व असलेल्या जिजाऊंनी.

- चंदाराणी कुसेकरहरवलेल्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी, आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ. स्वराज्य स्थापन करणे, ही धारणा शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींतून संस्कार होत गेले. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्र म अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू त्यांनी दिले. ‘शिवबा’ ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा यशस्वी प्रवास घडवला, तो मातृत्वात गुरुत्व असलेल्या जिजाऊंनी.

आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसाच लाभला आहे. इतिहासातील प्रत्येक पान म्हणजे हिरेमाणिक याच्या शब्दांनी रचलेले नितळ असं सोनेरी पानं! असाच एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माऊली अर्थात राजमाता जिजाऊ. आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला पहिला छत्रपती राजा दिला तो जिजाऊंनी. जिजाऊंशिवाय शिवबा छत्रपती झाला असता का? शेवटी, इतिहासाला जन्म द्यायलाही एक माऊलीच लागते, हे तितकेच खरे.राजमाता जिजाबाई भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराजांच्या आजी. या दोघांना घडवण्यात या माऊलीचा सर्वात मोठा वाटा होता. खेळ खेळण्याच्या वयात त्या तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. वाढत्या वयाबरोबरच पारतंत्र्याची जाण आणि लाचारी व फितुरीच्या रोगाचा तिरस्कार त्यांच्या मनात वाढत होता. भावना बाजूला सारून कर्तव्यात कसलीही कसूर होऊ न देता धैर्य आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाऊंचा गुण शिवाजी महाराजांमध्ये पुरेपूर उतरला होता. जिजाऊंनी बालशिवबाला रावणाचा वध करणारा राम, दुष्ट कंसाचा नाश करणारा कृष्ण, बकासुराचा वध करून लोकांची सुटका करणारा भीम यांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यातून पारतंत्र्यात असलेल्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याची शिकवण दिली. सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. राजनीती शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्यायाला शासन देण्याचे धाडस शिकवले.बालमनावर संस्कार करून शिवबारूपी कोहिनूर हिºयाला पैलू पाडण्याचे काम जिजाऊंनी केले. देव, धर्म आणि देशावर प्रेम करायला शिकवलं. सद्गुणांची व विचारांची दूरदृष्टी शिवबांना जिजाऊंकडूनच मिळाली. मातृवत्सलेने शिवरायांना स्वराज्यनिर्मितीचे धडे दिले. सर्व मराठ्यांमध्ये स्वाभिमान भिनवला. प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला. स्वराज्य जडणघडणीसाठी आयुष्य पणाला लावले. जिजाऊंच्या संस्काराने असा राजा घडवला, जो सिंहासनावर बसण्याआधीच ‘राजे’ म्हणून मान्यता पावला.माता खºया अर्थाने एक शिल्पकार असते. तिने दिलेले ज्ञान कुठल्याही ग्रंथापेक्षा प्रभावशाली आणि पवित्र असते. आपल्या मुलांना घडवण्याचं कर्तव्य ती पार पाडत असली, तरी ती माऊली आजही दुय्यमच आहे. अगदी घराघरांतही असमानता, आजही तिची उपेक्षा आणि गर्भातच तिची हत्या, हे सारं सत्य समोर असूनही आज कुठलीच माता आपल्या बालकावर संस्कार रुजवण्यात कमी पडत नाही. बाळाला चांगले संस्कार देण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती अशा अनंत गुणांचा समुच्चय आजच्या ‘आई’मध्येदेखील आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, ‘एक माता १०० शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते.’ त्यात एक शाश्वत सत्य दडलेले आहे. एक उत्तम मनुष्य म्हणून जगण्यास पात्र बनवते, ती आई.उपाशी राहून, काबाडकष्ट करून संसाराचा गाडा ओढताओढता कालवश होणारी, भूतदयेचे बाळकडू पाजून संस्कृती जपणारी माऊली आजच्या पिढीला अडगळ होताना दिसते. वृद्धाश्रमात आईला पोहोचवून पैशांनी सुख देऊ पाहणारी आणि प्रसंगी आईच्या अंत्यविधीलाही वेळ नसणारी पिढी तयार होत आहे. परंतु आधुनिकतेत जग कितीही पुढे गेले, तरी पुराणकाळापासून चिरंतन असलेले मातृरूप मात्र तेच असणार आहे.जीवनात यशाची शिखरे चढत असताना, केव्हातरी कुणीतरी जाणीव करून देते की, तुझ्या या कर्तृत्वामागे तुझ्या आईचा फार मोठा हात आहे आणि मनुष्य झटक्यात भानावर येतो. आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपले हे यश आपल्या आईची देणगी आहे, हे त्याला उमगते. आईने दिलेले संस्कार, शिकवण यातूनच माणूस मोठा होतो. बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य निसर्गाने आईलाच दिलेले आहे. प्रथम निर्मितीचा पाया; आत्मा आणि ईश्वराचा संगम, तर कधी ती विश्वाची माऊली असते. जिजाबाई म्हणजे याच शक्तीचे एक देखणे रूप! महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारण्यामागील या मूर्तिमंत व्यक्तिमत्त्वास मानाचा मुजरा!(लेखिका जि.प. शाळा, कशेळी येथे शिक्षिका आहेत.) 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र