शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विधिमंडळातील अवर सचिवाची बढती बेकायदा

By admin | Updated: July 22, 2016 03:57 IST

विधान परिषद सचिवालयाने नितीन शिवराम दळवी या कक्ष अधिकाऱ्यास चार वर्षांपूर्वी अवर सचिव या पदावर दिलेली बढती मुंबई उच्च न्यायालयाने नियमबाह्य ठरवली

मुंबई : विधान परिषद सचिवालयाने नितीन शिवराम दळवी या कक्ष अधिकाऱ्यास चार वर्षांपूर्वी अवर सचिव या पदावर दिलेली बढती मुंबई उच्च न्यायालयाने नियमबाह्य व बेकायदा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.नियमानुसार अवर सचिव पदावर बढतीसाठी कक्ष अधिकारी पदावर किमान तीन वर्षे सलग काम केलेले असणे आवश्यक आहे. दळवी यांनी कक्ष अधिकारी म्हणून या किमान आवश्यक कालावधीहून तीन महिने कमी काम केले होते. तरी ती तूट माफ करून २८ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांना बढती देण्यात आली. त्यामुळे मुळातच अपात्र असूनही दळवी यांना दिलेली बढती बेकायदा ठरते, असे न्यायालयाने नमूद केले. मात्र बढती प्रक्रियेतील ही अनियमितता कायदा व नियमांच्या चौकटीत राहून नियमित करणे शक्य असेल तर तसे करण्याची मुभा न्यायालयाने दिली.अवर सचिव या पदावर बढती न दिले गेलेले एक कक्ष अधिकारी प्रदीप सखाराम मयेकर यांनी केलेली रिट याचिका अंशत: मंजूर करून न्या. अनूप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. दळवी यांच्यासोबत सुभाष एस. नलावडे यांनाही बढती दिली गेली होती. मयेकर यांनी या दोन्ही बढत्यांना आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने मयेकर यांची स्वत:च्या बढतीची मागणी अमान्य केली व दळवी यांची बढती बेकायदा ठरविली.पूर्वीच्या भरती नियमांत अवर सचिव या पदासाठी कायद्याची पदवी हा एक निकष होता. मयेकर यांचे असे म्हणणे होते की, जानेवारी २००९मध्ये दोन वर्षांची ‘बीजीएल’ ही कायद्याची पदवी घेतल्यानंतर लगेच आपण बढतीसाठी आपला विचार करावा, अशी विनंती केली. पण दोन वर्षे त्यावर काहीही कारवाई केली गेली नाही. फेब्रुवारी १२मध्ये पात्रता निकष बदलून पदवीनंतरच्या तीन वर्षांच्या किंवा इयत्ता १२वीनंतरच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची कायद्याची पदवी असा केला गेला. नियमांत हा बदल केल्यानंतर चारच दिवसांत त्यानुसार दळवी व नलावडे यांना बढती दिली गेली. हे करताना सेवाज्येष्ठताही डावलली गेली; कारण हे दोघे सेवाज्येष्ठता यादीत आपल्याहून दोन वर्षे मागे होते. त्यामुळे जुन्या पात्रतानुसार आपल्याला बढती दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. (प्रतिनिधी) >घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे ठरेलनियमांत बदल केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत दळवी व नलावडे यांना बढती देण्यासाठी जी अपारदर्शी पद्धत अनुसरण्यात आली त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी नोंदविली. २०१४मध्ये झालेल्या अशाच बढत्यांची प्रक्रिया सहा महिने सुरू होती. त्यामुळे २०१२मधील बढत्यांमधील घाईगर्दी लक्षणीय ठरते.सरकार आणि सरकारी संस्थांना जे अधिकार दिलेले असतात ते त्यांनी जनतेचे विश्वस्त असल्याच्या भावनेने वापरायला हवेत. अन्यथा समानतेचा अधिकार निरर्थक ठरतील, याची कोर्टाने सचिवालयास जाणीव करून दिली. न्यायालयाने म्हटले की, पात्रता निकषांसंबंधी नियमांत केलला हा बदल वैध मार्गांनी केला गेला आहे. त्यामुळे त्यानंतर केल्या गेलेल्या बढत्यांना बदललेला निकष लावण्यात काही चूक नाही. नियम बदलल्यानंतर एकट्या मयेकर यांचा जुन्या नियमांनुसार बढतीसाठी विचार केला जाऊ शकत नाही.