शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळातील अवर सचिवाची बढती बेकायदा

By admin | Updated: July 22, 2016 03:57 IST

विधान परिषद सचिवालयाने नितीन शिवराम दळवी या कक्ष अधिकाऱ्यास चार वर्षांपूर्वी अवर सचिव या पदावर दिलेली बढती मुंबई उच्च न्यायालयाने नियमबाह्य ठरवली

मुंबई : विधान परिषद सचिवालयाने नितीन शिवराम दळवी या कक्ष अधिकाऱ्यास चार वर्षांपूर्वी अवर सचिव या पदावर दिलेली बढती मुंबई उच्च न्यायालयाने नियमबाह्य व बेकायदा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.नियमानुसार अवर सचिव पदावर बढतीसाठी कक्ष अधिकारी पदावर किमान तीन वर्षे सलग काम केलेले असणे आवश्यक आहे. दळवी यांनी कक्ष अधिकारी म्हणून या किमान आवश्यक कालावधीहून तीन महिने कमी काम केले होते. तरी ती तूट माफ करून २८ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांना बढती देण्यात आली. त्यामुळे मुळातच अपात्र असूनही दळवी यांना दिलेली बढती बेकायदा ठरते, असे न्यायालयाने नमूद केले. मात्र बढती प्रक्रियेतील ही अनियमितता कायदा व नियमांच्या चौकटीत राहून नियमित करणे शक्य असेल तर तसे करण्याची मुभा न्यायालयाने दिली.अवर सचिव या पदावर बढती न दिले गेलेले एक कक्ष अधिकारी प्रदीप सखाराम मयेकर यांनी केलेली रिट याचिका अंशत: मंजूर करून न्या. अनूप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. दळवी यांच्यासोबत सुभाष एस. नलावडे यांनाही बढती दिली गेली होती. मयेकर यांनी या दोन्ही बढत्यांना आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने मयेकर यांची स्वत:च्या बढतीची मागणी अमान्य केली व दळवी यांची बढती बेकायदा ठरविली.पूर्वीच्या भरती नियमांत अवर सचिव या पदासाठी कायद्याची पदवी हा एक निकष होता. मयेकर यांचे असे म्हणणे होते की, जानेवारी २००९मध्ये दोन वर्षांची ‘बीजीएल’ ही कायद्याची पदवी घेतल्यानंतर लगेच आपण बढतीसाठी आपला विचार करावा, अशी विनंती केली. पण दोन वर्षे त्यावर काहीही कारवाई केली गेली नाही. फेब्रुवारी १२मध्ये पात्रता निकष बदलून पदवीनंतरच्या तीन वर्षांच्या किंवा इयत्ता १२वीनंतरच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची कायद्याची पदवी असा केला गेला. नियमांत हा बदल केल्यानंतर चारच दिवसांत त्यानुसार दळवी व नलावडे यांना बढती दिली गेली. हे करताना सेवाज्येष्ठताही डावलली गेली; कारण हे दोघे सेवाज्येष्ठता यादीत आपल्याहून दोन वर्षे मागे होते. त्यामुळे जुन्या पात्रतानुसार आपल्याला बढती दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. (प्रतिनिधी) >घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे ठरेलनियमांत बदल केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत दळवी व नलावडे यांना बढती देण्यासाठी जी अपारदर्शी पद्धत अनुसरण्यात आली त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी नोंदविली. २०१४मध्ये झालेल्या अशाच बढत्यांची प्रक्रिया सहा महिने सुरू होती. त्यामुळे २०१२मधील बढत्यांमधील घाईगर्दी लक्षणीय ठरते.सरकार आणि सरकारी संस्थांना जे अधिकार दिलेले असतात ते त्यांनी जनतेचे विश्वस्त असल्याच्या भावनेने वापरायला हवेत. अन्यथा समानतेचा अधिकार निरर्थक ठरतील, याची कोर्टाने सचिवालयास जाणीव करून दिली. न्यायालयाने म्हटले की, पात्रता निकषांसंबंधी नियमांत केलला हा बदल वैध मार्गांनी केला गेला आहे. त्यामुळे त्यानंतर केल्या गेलेल्या बढत्यांना बदललेला निकष लावण्यात काही चूक नाही. नियम बदलल्यानंतर एकट्या मयेकर यांचा जुन्या नियमांनुसार बढतीसाठी विचार केला जाऊ शकत नाही.