शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:05 IST

Hotel, Restaurant Timings : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

ठळक मुद्देकोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

मुंबई : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सध्या असलेली वेळ मर्यादा हटवून रात्री १.३० पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी  हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.

देशातील सर्व क्षेत्रांपैकी पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे  सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आजपर्यंत देशातील ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट आर्थिक नुकसानीमुळे कायमस्वरूपी बंद झाली आहेत. २० टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित ५० टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत.

हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, भाडे आणि पगाराचा खर्च, जुन्या कर्जाची भरपाई, कमी व्यवसाय  आणि वीजबिल, वेतन, इतर शुल्क यामध्ये  सध्याच्या परिस्थितीत हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पुन्हा सुरू करून तो पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न अयशस्वी  ठरत आहेत. सध्या राज्याच्या सुमारे तीन कोटी लोकसंख्येचा कोरोना लसीचा किमान एक डोस झाला आहे आणि नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारला विनंती करतो की, राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांना गेल्या १८ महिन्यात झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत करावी. 

हॉटेल व्यवसायासाठी सकाळी ७ ते रात्री १०ची वेळ व्यवहार्य नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की, आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही  भाटिया म्हणाले. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल असेही सांगण्यात आले.

रेस्टॉरंटची सध्याची वेळ सकाळी ७ ते रात्री १० या व्यवसायाला पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी. रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केले जावे, या अटीवर शिथिलता द्यावी आणि प्रलंबित लसीकरण असल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंटना ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी.प्रदीप शेट्टी,वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

टॅग्स :hotelहॉटेलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र