शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:05 IST

Hotel, Restaurant Timings : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

ठळक मुद्देकोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

मुंबई : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सध्या असलेली वेळ मर्यादा हटवून रात्री १.३० पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी  हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.

देशातील सर्व क्षेत्रांपैकी पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे  सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आजपर्यंत देशातील ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट आर्थिक नुकसानीमुळे कायमस्वरूपी बंद झाली आहेत. २० टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित ५० टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत.

हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, भाडे आणि पगाराचा खर्च, जुन्या कर्जाची भरपाई, कमी व्यवसाय  आणि वीजबिल, वेतन, इतर शुल्क यामध्ये  सध्याच्या परिस्थितीत हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पुन्हा सुरू करून तो पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न अयशस्वी  ठरत आहेत. सध्या राज्याच्या सुमारे तीन कोटी लोकसंख्येचा कोरोना लसीचा किमान एक डोस झाला आहे आणि नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारला विनंती करतो की, राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांना गेल्या १८ महिन्यात झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत करावी. 

हॉटेल व्यवसायासाठी सकाळी ७ ते रात्री १०ची वेळ व्यवहार्य नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की, आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही  भाटिया म्हणाले. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल असेही सांगण्यात आले.

रेस्टॉरंटची सध्याची वेळ सकाळी ७ ते रात्री १० या व्यवसायाला पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी. रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केले जावे, या अटीवर शिथिलता द्यावी आणि प्रलंबित लसीकरण असल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंटना ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी.प्रदीप शेट्टी,वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

टॅग्स :hotelहॉटेलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र