शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:05 IST

Hotel, Restaurant Timings : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

ठळक मुद्देकोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी.

मुंबई : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सध्या असलेली वेळ मर्यादा हटवून रात्री १.३० पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी  हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.

देशातील सर्व क्षेत्रांपैकी पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे  सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आजपर्यंत देशातील ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट आर्थिक नुकसानीमुळे कायमस्वरूपी बंद झाली आहेत. २० टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित ५० टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत.

हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, भाडे आणि पगाराचा खर्च, जुन्या कर्जाची भरपाई, कमी व्यवसाय  आणि वीजबिल, वेतन, इतर शुल्क यामध्ये  सध्याच्या परिस्थितीत हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पुन्हा सुरू करून तो पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न अयशस्वी  ठरत आहेत. सध्या राज्याच्या सुमारे तीन कोटी लोकसंख्येचा कोरोना लसीचा किमान एक डोस झाला आहे आणि नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारला विनंती करतो की, राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांना गेल्या १८ महिन्यात झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत करावी. 

हॉटेल व्यवसायासाठी सकाळी ७ ते रात्री १०ची वेळ व्यवहार्य नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की, आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही  भाटिया म्हणाले. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल असेही सांगण्यात आले.

रेस्टॉरंटची सध्याची वेळ सकाळी ७ ते रात्री १० या व्यवसायाला पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी. रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केले जावे, या अटीवर शिथिलता द्यावी आणि प्रलंबित लसीकरण असल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंटना ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी.प्रदीप शेट्टी,वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

टॅग्स :hotelहॉटेलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र