शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवद्गीता, संत साहित्याचा समावेश करा; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:41 IST

यापूर्वी गुजरातमध्ये ६ वी ते १२ वी च्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्याचा शालेय शिक्षणात समावेश करण्याची भाजपची मागणी.

गुजरातच्या भाजप सरकारने इयत्ता ६ वी ते १२ च्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा केली होती. हा टप्पा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून लागू होईल. सरकारचा हा निर्णय गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना लागू होणार आहे. यानंतर कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनीही कर्नाटकात अभ्यासक्रमातही भगवद्गीतेचा समावेश केला जाऊ शकतो असे संकेत दिले होते. यानंतर आता महाराष्ट्रातही भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश केला जावा अशी मागणी भाजपनं केली आहे.

"भगवद्गीता हे जीवन जगण्याचं सूत्र आहे. गुजरात सरकारनं शालेय शिक्षणात भगवद्गीता शिकवण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय उत्तम निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारनंसुद्धा भगवद्गी, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथासारखं संत साहित्य याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरून भावी पीढी संस्कारक्षम होईल, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणतंही राजकारण न आणता भगवद्गीता आणि संत साहित्य यांचा शिक्षणात समावेश करावा अशी आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी आहे," असं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले.

कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमातही भगवद्गीता?दुसरीकडे, कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमातही भगवद्गीतेचा समावेश केला जाऊ शकतो. यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी शुक्रवारी संकेत दिले. भगवद्गीता केवळ हिंदूंसाठी नाही, ती सर्वांसाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ते शाळेत शिकवलेच पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला ठरवावे लागेल की शाळेत नैतिक शिक्षण पुन्हा सुरू करायचे की नाही. तसेच, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी लागेल, जी नैतिक शिक्षणात कोणते विषय असावेत, याचा निर्णय घेईल. ज्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो, ते शिकवायला सुरुवात केली जाऊ शकते, मग ती भगवद्गीता असो, रामायण असो किंवा महाभारत असो, असे बी.सी. नागेश म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेVarsha Gaikwadवर्षा गायकवाड