शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 06:29 IST

Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रत दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने अफवांना आळा बसला. मात्र उर्वरित ठिकाणी झालेल्या हिंसक घटना, सरकारी कार्यालयांची तोडफोड आणि पोलिसांवरील दगडफेकीमुळे या आंदोलनाला गालबोटही लागले.आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. मुंबई, ठाणे आणि कोकण वगळता इतरत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि बंद यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही दिवसांत आंदोलकांनी एस.टी. बसला टार्गेट केल्यामुळे परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर उतरवली नाही. त्यामुळे आंदोलकांच्या तडाख्यातून एसटी वाचली. पश्चिम महाराष्टÑात बंद शांततेत पार पडला. सर्वपक्षीयांनी बंदचे आवाहन केल्याने अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती होती.अहिंसक मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले होते. तशी आचारसंहिताही लागू केली होती. मात्र तरीही बंददरम्यान पुणे, औरंगाबाद येथे हिंसक पडसाद उमटले.>मुंबईतील बाजारपेठा ठप्प : मुंबईतील वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणत्याही हिंसक घटनेविना बहुतेक बाजारपेठा, शाळा व दुकाने बंद असल्याने मुंबई स्तब्ध झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.>विदर्भात उत्स्फूर्त बंद : बंदला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणतीही अनुचित घटना न घडता बंद शांततेत पार पडला. नागपूरसह अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठ बंद होती. शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बुलडाण्यात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मुंडन केल. तर नागपुरात रेल्वेरुळावर बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच बाजूला केल्याने दुर्घटना टळली.>दोघांची आत्महत्यामराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी घडल्या.>जिल्हाधिकारी कार्यालयात राडापुण्यात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. चांदणी चौकातही आंदोलकांनी राडा केला.या वेळी झालेल्यादगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.>औरंगाबादनजीक वाळूजयेथे आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा