शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

मी २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत स्वत:ची तुलना केली तर...; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:03 IST

राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांत आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ साली पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या फडणवीस यांना २०१९ मध्ये दुसऱ्या शपथविधीनंतर केवळ काही तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२२ साली सरकार आल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आता भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. या राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांतील अनुभवांतून आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागील १० वर्षांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते एक टीम वर्क असतं आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा तो एक धडा असते. या सर्व कालखंडात मला शिकवणूक मिळाली आहे आणि मी माझी तुलना २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत केली तर आज मी स्वत:ला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो. कारण वेगवेगळ्या अनुभवांमधून वास्तव आपल्या लक्षात येतं आणि काही आघात सहन केल्यामुळे आपली शक्ती वाढते, आत्मिक ताकद वाढते. तसंच एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा, हेही आपल्याला कळतं. त्यामुळे माझ्यात मागील १० वर्षांत बदल झाला असून तो चांगल्या दिशेने झाला आहे," असं म्हणत फडणवीस यांनी मागील दशकभराच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयाचं कारण कोणतं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपनेही आजपर्यंतच्या राज्याच्या राजकारणाच्या इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवलं. या यशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या विजयात नक्कीच हिंदुत्त्वाचा मोठा वाटा आहे. लोकांनी महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर दिलं आहे. हिंदू समाजाने जातपात विसरून आम्हाला मतदान दिलं. पण त्यासोबत आमच्या सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्यातून आमच्याविषयी प्रो इन्कम्बन्सी तयार झाली आणि त्यामुळे हे यश मिळालं," असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी काळात नदीजोड प्रकल्प आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र