शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

राज्यात पावसाने दडी मारल्यानी पीक वाढीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:48 IST

नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता

पुणे: राज्यात बहुतांश विभागात पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाआभावी त्यांच्या वाढीवर परिणाम होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १ जून ते २८ सप्टेंबर कालावधीमध्ये राज्यातील सरासरी पाऊस १ हजार ११७.८ मि.मी.असून २८ सप्टेंबरपर्यंत ८६४.९ म्हणजेचे सरासरीच्या ७७.४ टक्के पाऊस झाला आहे.पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती तसेच लातूर विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पुढील पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे,असे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हात २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला आहे.तर नाशिक,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,कोल्हापूर,औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उत्स्मानाबाद,परभणी,बुलढाणा आणि चंद्रपूर या १३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.केवळ ठाणे,रत्यागिरी व सातारा या तीनच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून इतर १७ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ४६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र, चंद्रपूर जिल्ह्यात ११ हजार १६१ हेक्टर क्षेत्र,नांदेडमधील ७१ हजार ३४९ हेक्टर तर जळगावमधील २५४ हेक्टर,गडचिरोलीतील ९ हजार ६४२ हेक्टर ,नंदूरबारमधील ६१५ हेक्टर,धुळे ८५८ हेक्टर ,सातारा ३१८ हेक्टर व सांगली ४०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात कापूस,सोयाबीन, तूर, भात,कांदा,ज्वारी,बाजरी, नाचणी, मुग, उडीद, भुईमुग,मका,वटाणा ,घेवडा,पावटा आदी पिकांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे राज्यात सोलापूर जिल्ह्यात २९ हजार ५३९ हेक्टर ,अहमदनगर जिल्ह्यात ३४ हजार ७९८,पुणे २७ हजार ४२ हेक्टर, कोल्हापूर ९ हजार हेक्टर,सांगली ३ हजार ४०० हेक्टर व सातारा जिल्ह्यात ४ हजार ५०० हेक्टर असे एकूण १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसपिकाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे...............पुणे विभाग पावसाचा खंड  पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम झाला असून त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत एकूण ३९ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के,१६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, ४ तालुक्यात ७५ ते १०० तर ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती