शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

राज्यात पावसाने दडी मारल्यानी पीक वाढीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:48 IST

नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता

पुणे: राज्यात बहुतांश विभागात पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाआभावी त्यांच्या वाढीवर परिणाम होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती शाखेकडील अहवालानुसार राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १ लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे. राज्याच्या कृषी विभागातर्फे पीक पेरणी व त्याच्या परिस्थितीचा २८ सप्टेंबरपर्यंतचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १ जून ते २८ सप्टेंबर कालावधीमध्ये राज्यातील सरासरी पाऊस १ हजार ११७.८ मि.मी.असून २८ सप्टेंबरपर्यंत ८६४.९ म्हणजेचे सरासरीच्या ७७.४ टक्के पाऊस झाला आहे.पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती तसेच लातूर विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे पुढील पिकांच्या उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे.पिकांच्या पुढील वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे,असे कृषी अहवालात नमूद करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हात २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला आहे.तर नाशिक,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,कोल्हापूर,औरंगाबाद,जालना,बीड,लातूर,उत्स्मानाबाद,परभणी,बुलढाणा आणि चंद्रपूर या १३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.केवळ ठाणे,रत्यागिरी व सातारा या तीनच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून इतर १७ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ४६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र, चंद्रपूर जिल्ह्यात ११ हजार १६१ हेक्टर क्षेत्र,नांदेडमधील ७१ हजार ३४९ हेक्टर तर जळगावमधील २५४ हेक्टर,गडचिरोलीतील ९ हजार ६४२ हेक्टर ,नंदूरबारमधील ६१५ हेक्टर,धुळे ८५८ हेक्टर ,सातारा ३१८ हेक्टर व सांगली ४०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.त्यात कापूस,सोयाबीन, तूर, भात,कांदा,ज्वारी,बाजरी, नाचणी, मुग, उडीद, भुईमुग,मका,वटाणा ,घेवडा,पावटा आदी पिकांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे राज्यात सोलापूर जिल्ह्यात २९ हजार ५३९ हेक्टर ,अहमदनगर जिल्ह्यात ३४ हजार ७९८,पुणे २७ हजार ४२ हेक्टर, कोल्हापूर ९ हजार हेक्टर,सांगली ३ हजार ४०० हेक्टर व सातारा जिल्ह्यात ४ हजार ५०० हेक्टर असे एकूण १ लाख ८ हजार २७९ हेक्टर उसपिकाचे क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झाले आहे...............पुणे विभाग पावसाचा खंड  पुणे विभागात पावसाच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम झाला असून त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत एकूण ३९ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात २५ ते ५० टक्के,१६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के, ४ तालुक्यात ७५ ते १०० तर ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती