शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

झेपत नसेल तर विमानाप्रमाणे रेल्वेचेही खासगीकरण करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:11 AM

दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही.

मुंबई - दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. रेल्वेला हे झेपत नसेल, तर त्यांनी विमानतळाप्रमाणे रेल्वेचे खासगीकरण करावे, अशी शब्दांत उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला मंगळवारी चपराक लगावली.दिव्यांगांसाठी रेल्वेसेवेत विशेष सोईसुविधा पुरविण्यासंदर्भात ‘इंडिया सेंटर फॉर ह्युमन राइट्स अँड लॉ’ या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर, न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.मुंबईत सतत तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम रेल्वेवरही झाला. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी लोकल ठप्प झाली. काही काळाने लोकल सुरू झाली. मात्र, गाड्या उशिराने धावत होत्या. याची नोंद घेत उच्च न्यायालयाने रेल्वेला फैलावर घेतले. ‘दरवर्षी पावसाळ्यात सखोल भागातील रूळ पाण्याखाली जातात. सायन, माटुंगा, मानखुर्द, नालासोपारा यांसारख्या सखोल भागातील रूळ मान्सूनपूर्वच वाढविण्याचे काम का करण्यात येत नाही?’ असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वेला केला.रेल्वे रुळांची देखभाल, प्लॅटफॉर्मची देखभाल, स्वच्छता यांसारख्या बाबी रेल्वेला करणे शक्य नसेल, तर त्यांनी याचे खासगीकरण करण्याचा गांभीर्याने विचार करावा. आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकही आंतरराष्ट्रीय दर्जाची करता येतील. प्रवासी तुमच्याकडून याच सुविधांची अपेक्षा करतात, असे न्यायालयाने म्हटले.‘स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन बोर्ड स्थापन करा’छोट्या छोट्या परवानग्यांसाठी दिल्लीला जावे लागणार नाही, यासाठी मुंबईतच स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन बोर्ड स्थापन करून त्यांनाच अधिकार का देत नाही? असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणीत याबाबत सूचना घेण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.

टॅग्स :railwayरेल्वेMumbai High Courtमुंबई हायकोर्ट