शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:33 IST

"...नाहीतर, अमित शहा हे दोन दोन, तीन तीन वेळा यासंदर्भात बोललेच नसते."

महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर, भारतीय जनता पक्ष युती अर्थात महायुती सत्तेवर आल्यास, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणार, अशी भविष्यवाणी जयंत पाटलांनी केली आहे. याच वेळी, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील, हे सांगता येत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. ते पंढरपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. 

महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसंदर्भात भविष्यवाणी करताना जयंत पाटील म्हणाले, "महायुती सत्तेत अल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. हे अमित शाह यांनी दहा वेळा सांगितले आहे. निवडणुकीनंतर, भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे." 

याच वेळी, "एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हे कधी सुट्टी देतील हे सांगता येत नाही. शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनाच करायचे, हाच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. नाहीतर, अमित शहा हे दोन दोन, तीन तीन वेळा यासंदर्भात बोललेच नसते." असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी ही नावंही चर्चेत -राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर चर्चा सुरू असताना आता केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावेही समोर आली आहेत.

यातच, भाजपा नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर अन्य काही चेहरेदेखील आहेत, असे म्हटले होते. यानंतर आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत, असे म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार