शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:22 IST

Lokmat Maharashtrian of The Year 2025: 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

Devendra Fadnavis IMOTY 2025:  देशाच्या भविष्यातील राजकारणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे अधोरेखित केले. शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांनी काही अपेक्षा विरोधी पक्षांकडून व्यक्त केल्या. "शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे म्हणत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. 

महाराष्ट्राची भूमिका काय असेल?

'देवेंद्रजी, भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय. भारतीय राजकारणाच्या सद्यस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल, असं तुम्हाला वाटतं?', असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. 

प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बघा, काय आहे की, शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होतेय आणि साधारणपणे भारतीय राजकारणातील नवा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे लोक निर्णायक अशा पद्धतीने मतदान करताहेत. मला असं वाटतं की, ९०च्या दशकातील कल काय होता, तर आघाडी सरकारांचा होता."

भारतासमोर अभूतपूर्व संधी -फडणवीस

"आघाडीमध्ये केंद्रस्थानी जो पक्ष असायचा, तो कमकुवत असायचा आणि त्यामुळे ती आघाडी जी आहे, ती नीट बांधलेलं नसायचे आणि अनेक अडचणी यायच्या. पण, आता अशी परिस्थिती नाहीये. आता निर्णायक बहुमत मिळत आहे. संजीव बजाजजींनी सांगितलं की, अभूतपूर्व संधी भारतासमोर आहेत. ज्या प्रकारे जिओपॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळतेय. संधी येतेय. तंत्रज्ञानामध्ये पुढच्या टप्प्यावर आपण चाललो आहोत. अशा लोकशाहीमध्ये सक्रिय भूमिका असली पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या भूमिकेबद्दल फडणवीसांनी काय भाष्य केले?

"एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगला विरोधक असणं. शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

पवार साहेबांसारखे प्रमुख विरोधी पक्ष असते, तर...

"अगदी सांगायचं झालं, तर जयंतराव तुम्ही आज विरोधी पक्षात आहात. तुमच्यासारखे लोक, पवार साहेबांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असते, तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती. पण, आज दुर्दैवाने केंद्रात विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रात प्रगल्भता नसेल... म्हणजे आपली वेगवेगळी मते असू शकतात, पण त्याचा अर्थ हा नाहीये की, प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. 

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज -CM फडणवीस

"टोकाचाच विरोध केला पाहिजे. विरोध करतात करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतोय का की, ज्या शक्तींना भारताची प्रगती नकोय. म्हणून त्या शक्ती अदृश्यपणे काम करताहेत, अशा शक्तींची मदत आपण घेतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा आवश्यकता आहे. आताच्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की, सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची असेल, तर जबाबदार विरोधी पक्षाची आहे", अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार