शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:22 IST

Lokmat Maharashtrian of The Year 2025: 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

Devendra Fadnavis IMOTY 2025:  देशाच्या भविष्यातील राजकारणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे अधोरेखित केले. शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांनी काही अपेक्षा विरोधी पक्षांकडून व्यक्त केल्या. "शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे म्हणत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. 

महाराष्ट्राची भूमिका काय असेल?

'देवेंद्रजी, भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय. भारतीय राजकारणाच्या सद्यस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल, असं तुम्हाला वाटतं?', असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. 

प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बघा, काय आहे की, शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होतेय आणि साधारणपणे भारतीय राजकारणातील नवा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे लोक निर्णायक अशा पद्धतीने मतदान करताहेत. मला असं वाटतं की, ९०च्या दशकातील कल काय होता, तर आघाडी सरकारांचा होता."

भारतासमोर अभूतपूर्व संधी -फडणवीस

"आघाडीमध्ये केंद्रस्थानी जो पक्ष असायचा, तो कमकुवत असायचा आणि त्यामुळे ती आघाडी जी आहे, ती नीट बांधलेलं नसायचे आणि अनेक अडचणी यायच्या. पण, आता अशी परिस्थिती नाहीये. आता निर्णायक बहुमत मिळत आहे. संजीव बजाजजींनी सांगितलं की, अभूतपूर्व संधी भारतासमोर आहेत. ज्या प्रकारे जिओपॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळतेय. संधी येतेय. तंत्रज्ञानामध्ये पुढच्या टप्प्यावर आपण चाललो आहोत. अशा लोकशाहीमध्ये सक्रिय भूमिका असली पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या भूमिकेबद्दल फडणवीसांनी काय भाष्य केले?

"एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगला विरोधक असणं. शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

पवार साहेबांसारखे प्रमुख विरोधी पक्ष असते, तर...

"अगदी सांगायचं झालं, तर जयंतराव तुम्ही आज विरोधी पक्षात आहात. तुमच्यासारखे लोक, पवार साहेबांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असते, तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती. पण, आज दुर्दैवाने केंद्रात विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रात प्रगल्भता नसेल... म्हणजे आपली वेगवेगळी मते असू शकतात, पण त्याचा अर्थ हा नाहीये की, प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. 

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज -CM फडणवीस

"टोकाचाच विरोध केला पाहिजे. विरोध करतात करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतोय का की, ज्या शक्तींना भारताची प्रगती नकोय. म्हणून त्या शक्ती अदृश्यपणे काम करताहेत, अशा शक्तींची मदत आपण घेतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा आवश्यकता आहे. आताच्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की, सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची असेल, तर जबाबदार विरोधी पक्षाची आहे", अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार