शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

By admin | Updated: July 24, 2015 02:25 IST

आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय

मुंबई : आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर फक्त अराजक आणि अराजकच माजेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलखतीत दिला आहे.युती मजबूत करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत. शिवसेना ही सत्तेकरिता कधी युती करत नाही. निवडणुका असोत किंवा नसोत, चांगले दिवस असोत की नसोत एकदा मित्र म्हटले म्हणजे मित्र ही शिवसेनेची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ती आपल्याला शिकवली आहे, अशा शब्दांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात व युतीचे राजकारण पुरे करा असे सांगतात. पण तिथे काश्मीरमध्ये मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठे आश्चर्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गोंदियातील काँग्रेस व भाजपा युतीवरही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात व राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण ही सरकारे शिवसेनेची नाहीत. पूर्वी एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. चंद्राबाबू, रामविलास पासवान असे नेते एनडीएत आले व गेले. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशा प्रकारे जर सरकार चालवणार असाल तर तशा राजकारणात शिवसेना पडणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)