शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 18:21 IST

२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ते पोहरादेवीच्या दर्शनाला वाशिमला गेले होते.

आजची ही जाहीर सभा नाहीय. मला इथले लोक भेटायला आले होते. त्यांना मी म्हटले पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहे. जाहीर सभा नाही तर कार्यकर्त्यांशी बोलायचे आहे. आज गर्दी पाहून निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते. भाजपाने आमच्यावर टीका केली. पहिले निष्ठावंत आता कुठल्या सतरंजीखाली सापडतायत ते पहावे. अनेकांना भाजपा रुजवला आणि वाढविला. आज त्यांच्यासारखी निष्ठावंत माणसे आहेत त्यांची काय अवस्था झालीय. सगळे बाजार बुनगे येतायत, भ्रष्टाचाराने बरबटलेले येतायत आणि त्यांच्या सतरंज्या हे निष्ठावंत उचलतायत. राजकारण म्हटले की फोडाफोडीचे असते. भुजबळ आमच्याकडे होते, राष्ट्रवादीत गेले आता तिकडे गेले. आता पक्ष फोडायला सुरुवात झाले आहे. मतातून सरकार येत होते. आता खोक्यातून येत आहे. माझा कारभार वाईट होता, तर जनता मला घरी बसवेल. परंतू तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून बाजुला केले. ते जाऊद्या, जर तुमचे सरकार १६५ आमदारांचे होते, तर राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना का फोडले असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

अमित शहा यांनी अडीच वर्षे आमची अडीच वर्षे शिवसेनेचा असे म्हणालेले. म्हणून आम्ही युती केली. ते झाले असते तर आज तुमचा मुख्यमंत्री असला असता. सध्या महागाईने वेढले आहे. जेव्हा ही चर्चा सुरु होते, तेव्हा हे काहीतरी टुम काढतात आणि आपण लढत राहतो. आता समान नागरी कायदा आणताय, आम्ही काश्मीरमधील ३७० कलमावर पाठिंबा दिलाच होता. परंतू अखंड देशात एकच पक्ष असला पाहिजे या भुमिकेला आमचा विरोध असेल. सबका मालिक एक, या भावनेने हे लोक पक्ष ताब्यात घेत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला. 

माझ्या राज्यात प्रजा संकटात असेल तर मुख्यमंत्री म्हणून धावून नाही गेले तरी चालतील परंतू समस्या सोडविली पाहिजे. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. चार दिवसांनी एक गट आम्हीच राष्ट्रवादी म्हणत त्यांच्यासोबत गेला आहे. आता याच राष्ट्रवादींसोबत मोदींचा फोटो येणार आहे. हे भोपाळमध्ये बोलतात, पण मणिपूरवर एक शब्द जरी बोलला का? असा आरोप ठाकरे यांनी केला. 

मी मणिपूर शांत करायचे असेल तर एक तोडगा सांगतो. विरोधी पक्षनेत्यांच्या घरावर नेत्यांवर ईडी सीबीआयच्या धाडी टाकता ना त्या ईडी सीबीआय आयकर विभागाला मणिपूरला पाठवा. एकदा का धाडी पडल्या की ते लोक तुमच्या पक्षात येतील आणि मणिपूर शांत होऊन जाईल, प्रश्न संपेल. आमदार गेले, खासदार गेले, जाऊद्या. ते गेले तरी चालतील कारण दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असे ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rathodसंजय राठोड