शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

डाटा चुकीचा असेल तर केंद्रीय योजनांत घोटाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 08:24 IST

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. सोमवारी विधानसभेत आणि अध्यक्षांच्या दालनातील गोंधळानंतर भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे डाटा देण्याची मागणी ठरावाद्वारे केली. यात विरोधकांना मिरच्या झोंबण्यासारखे आणि आकांडतांडव करण्यासारखे काय होते, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच केंद्राकडील डाटामध्ये आठ कोटी चुका असल्याचे विरोधक म्हणत आहेत. तसे असेल तर याच डाटावर चालविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये घोटाळा, गडबड झाली म्हणायचे का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. सोमवारी विधानसभेत आणि अध्यक्षांच्या दालनातील गोंधळानंतर भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यावर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य केले. काल जे काही घडले, हे कितीही कुणी काही म्हटले तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेले आहे. ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.इम्पिरिकल डाटाची मागणी करणारा ठराव सरकारने मांडला. यावर विरोधकांनी वणवा लागल्यासारखे वागायचे कारण काय, आग लागल्यासारखे थयथयाट कशाला करता, अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. केंद्राच्या डाटामध्ये आठ कोटी आणि महाराष्ट्रात ७० लाख चुका असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या कानात कोणी आकडे सांगितले. केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या विविध योजनांसाठी हाच आकडा, डाटा वापरला जातो.  पंतप्रधानांच्या भेटीत, राज्यपालांच्या पत्रातही अशी मागणी केली होती, असे ते म्हणाले.

जो प्रकार घडला तो शरमेने मान खाली घालायला लावणारा होता. पण, ही घटना आम्ही घडवली नाही किंवा त्यांना टोचले नव्हते. ओबीसी, मराठा आरक्षणासाठी ठराव मांडले. इम्पिरिकल डाटा मागितला. त्यात नवीन काहीच नव्हते.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेOBC Reservationओबीसी आरक्षण