शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

महाराष्ट्रात एकजूट झाल्यास कॉँग्रेसला केंद्रात सत्ता - खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 6:34 AM

पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल.

मुंबई  - पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल. त्यामुळे हात जोडतो, एक व्हा, मतभेद टाळा. जुन्या गोष्टी विसरून काँग्रेसला विजयी करण्यास एकदिलाने काम करा. दिल्लीतील विजय महाराष्ट्रातील एकजुटीतून मिळेल, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी नेत्यांना एकीचा मंत्र दिला. महाराष्ट्राचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर खर्गे प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. सकाळी त्यांनी प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन पुढील रणनीतीची चर्चा केली.देशातील लोकशाहीच संकटात सापडली आहे. देशाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणायचे आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कामगिरीवरच दिल्लीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे. केंद्रात सत्ता आणायची असेल, तर महाराष्ट्र राखावाच लागेल. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी अंतर्गत वाद बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. - खा. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी‘प्रोजेक्ट शक्ती’ने जनसहभागपक्षाचे धोरण, निर्णयप्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांचाही समावेशव्हावा, यासाठी काँग्रेसने ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानाची राज्यात सुरुवात केली. ८८२८८४३०१० क्रमांकावर मतदार ओळखपत्रावरील क्रमांक एसएमएसद्वारे पाठविल्यास संबंधिताची नोंदणी होईल. त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज पाच नोंदणीकृत कार्यकर्त्यांशी स्थानिक विषयांवर फोनद्वारे संवाद साधणार आहेत.संविधानाचे रक्षण केले म्हणून चहावाला पंतप्रधानसायंकाळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यभरातील पदाधिकाºयांना संबोधित केले. खर्गे म्हणाले, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील वाढते अत्याचार, बिघडलेली अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवरून खर्गेयांनी मोदींवर टीकेची झोड उठविली. हरित क्रांतीपासून अंतराळातील यशाचापाया काँग्रेसने रचला आहे. काँग्रेसनेच देशातील लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण केले, म्हणूनच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला. गिरणी कामगाराचा मुलगा लोकसभेतील विरोधी पक्षांचा नेता आहे, असा टोलाहीखर्गे यांनी हाणला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण