शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

तेही शब्द मागे घेतील ही अपेक्षा, रवी राणांच्या प्रतिक्रियेनंतर बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:06 IST

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

"मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन. माझ्यासाठी कार्यकर्ते आणि जनता महत्वाची आहे. आम्ही उद्या बैठक घेणार आहे. आम्ही तिथे आमची भूमिका स्पष्ट करणार आहे, कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. 

"वाद हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे. या आरोपावर मी शांत बसलो असतो तर माझी बदनामी झाली असती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. त्यांनी हा वाद मिटवला. या आरोपामुळे माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे हा वाद वाढला होता. यावर आता उद्या मी कार्यकर्त्यांसोूत बोलणार आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. 

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! 

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले. 

"गेल्या आठ- दहा दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर आज पडता पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वर्षा बंगल्यावर तीन तास चर्चा झाली. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्य निघाली असतील तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाBachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण