शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:38 IST

नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला होता. त्यासोबत काही पदाधिकारीही होते. मात्र त्यातीलच एक पदाधिकारी आज शरद पवार गटात पुन्हा परतला आहे.

ठाणे - काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यात शरद पवारांच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत NCP विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण शिखरे यांचाही अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. मात्र आता या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीत हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. माझ्यावर दबाव टाकून माझा पक्षात प्रवेश करून घेतला असा दावा किरण शिखरे यांनी केला आहे.

ठाणे येथे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत उपस्थित किरण शिखरे यांनी म्हटलं की,  मला जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून कोकण विभाग अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस जबाबदारी  देण्यात आली होती. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत निष्ठेने राहावं असं मला वाटत होतं. त्यासाठी मी जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्याकडे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. मी स्वत: त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मी ओबेरॉय हॉटेलला भेटायला गेल्यावर मला तिथे पक्षप्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. तेव्हा मी जिथे आहे तिथे निष्ठेने राहीन, माझ्यावर दबाव टाकू नका असं मी म्हटलं. पण त्या गोष्टी न ऐकता पक्षप्रवेशासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी कुठेही गेलो नाही. मी २४ तासांत पुन्हा माझ्या साहेबांकडे आलो आहे. मला अतिशय टॉर्चर केले गेले असा आरोप शिखरेंनी लावला. 

तसेच मी कालपासून मी घरी गेलो नाही. घरापर्यंत माणसं पाठवली जातायेत. मला आव्हाडांकडून जो चुकून प्रकार घडला त्याचा निषेध करायला सांगितले. तू एससीचा आहे असं म्हटलं गेले. पण मी छातीठोकपणे सांगतो, माझ्याकडे जातीने पाहिले नाही. मला पक्षप्रवेश करण्यासाठी तुला विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवतो. जे हवं ते देतो असं सांगितले. परंतु मी कुठल्याही पदासाठी प्रलोभनासाठी गेलो नाही. वेळोवेळी आम्ही शरद पवारांच्या माध्यमातून काम केले. सुप्रिया सुळेंवर आज ते टिका करतायेत. पण एप्रिल महिन्यापासून सोनिया दुहन यांनी प्रचार बंद केला होता. भाजपाविरोधात कुठलेही ट्विट टाकलं नव्हते असंही किरण शिखरे यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवारांनी या लोकांना भरभरून दिले. त्यांना सन्मान राखला गेला पण हे लोक सोडून दिले. परंतु मी माझ्या पक्षाशी, शरद पवारांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. मी जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काम करून इथपर्यंत आलो आहे. मरेपर्यंत मी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांसाठी काम करत राहणार आहे. मी माझ्या घरी जाऊ शकत नाही इतका माझ्यावर दबाव आहे. आज मी हे बोलल्यानंतर कुठल्या गुन्ह्यात मला लटकवलं जाईल हे माहिती नाही. परंतु मला मारून टाकलं तरी पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले ते दबावातून घडले. मी मुंबईतून कल्याणला पळून आलो, त्यानंतर आज ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना भेटायला आलोय असा दावाही किरण शिखरे यांनी केला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे