शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘रेल के सफर में तुझे सुरक्षित जाते देखा!’; बोर्डीतील शेतकऱ्याच्या कवितेची रेल्वेमंत्र्यांकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:25 AM

पीयूष गोयलांचे ट्विट, किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली,

अनिरुद्ध पाटील बोर्डी : रेल के सफर में तुझे सुरक्षित, संभलकर जाते देखा, व्यापारियों के हौसला में बदलाव आते देखा... भारतीय रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून डहाणू तालुक्यातील उत्पादित चिकू फळ दिल्ली बाजारपेठेत कमी वेळेत व उत्पादन खर्चात पोहोचत असून, बागायतदारांच्या जीवनात बदल घडवला आहे, अशी भावना व्यक्त करणाऱ्या बोर्डीतील बागायतदाराच्या कवितेची दखल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेत ती ट्विट केली आहे. त्यानंतर या कवितेची चर्चा देशभर होत आहे.

किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली, गाडीत बसल्यानंतर खिडकीनजीक बसण्याचा आनंद लुटता येण्याबाबतचा उल्लेख आहे. ट्रकमधून उघड्यावर प्रवास करणाऱ्या चिकूला रेल्वेच्या डब्यातून सुरक्षित व आरामदायी प्रवास होऊ लागला. बाजारात पोहोचेपर्यंत फळाचा दर्जा चांगला राहणार आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही हे महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन कवितेत केले आहे. पाटील यांनी कविता बागायतदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोस्ट केली. कृष्णा नावाच्या शेतकऱ्यामार्फत रेल्वे अधिकारी आणि त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत ही कविता पोहोचली. बागायतदारांच्या जीवनात या विशेष गाडीचे महत्त्व अधोरेखित करीत असल्याचे त्यांनी ट्विटमधून मांडले असून, त्यानंतर देशभर कवितेवर चर्चा सुरू झाली आहे.

रेल्वेने वाहतूक केल्यास खर्च येतो कमी रेल्वेतर्फे जानेवारीपासून डहाणू रोड ते दिल्ली स्थानकापर्यंत चिकूफळे निर्यातीसाठी सहा डब्यांची सुविधा उपलब्ध केली. तर गेल्या आठवड्यापासून पश्चिम रेल्वेने सहाऐवजी १२ डबे देत बागायतदारांना बोनस दिला आहे. डहाणू घोलवड भौगोलिक मानांकनप्राप्त चिकू २२ तासांत दिल्ली बाजारपेठेत पोहोचत आहेत. ट्रकद्वारे वाहतुकीला लागणाऱ्या आठ ते नऊ रुपये प्रति किलो खर्चाच्या तुलनेत रेल्वेने वाहतूक केल्यास दोन रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. आठवड्यातून तीन वेळा ही विशेष शेतमाल घेऊन जाणारी गाडी डहाणू रोड स्थानकातून सोडली जाते. 

चिकूफळ निर्यातीला रेल्वे सुविधा निर्माण झाल्याने, डहाणूतील बागायतदारांच्या जीवनात घडलेल्या भावना कवितेतून मांडल्या. सोशल मीडियाद्वारे त्या रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्याची दखल घेतली. शासनाच्या निर्णयाने शेवटच्या घटकापर्यंत, जीवनात होणारे बदल यातून व्यक्त होतात. - प्रीत पाटील, चिकू बागायतदार, बोर्डी

टॅग्स :railwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलFarmerशेतकरी