शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

डॉक्टर-रु ग्ण यांच्यात हवी मानवतेची किनार

By admin | Updated: June 30, 2014 00:44 IST

रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रति सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टर आणि रु ग्ण यांच्यातील संबंधांना मानवतेची किनार हवी आहे.

‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ पदग्रहण सोहळानागपूर : रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रति सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टर आणि रु ग्ण यांच्यातील संबंधांना मानवतेची किनार हवी आहे. यासाठी डॉक्टर-रु ग्ण संवाद वाढायला हवा. रु ग्णांनीही अधिक मनमोकळेपणाने डॉक्टरांसमोर आपल्या समस्या मांडायला हव्यात, असे प्रतिपादन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी येथे केले.‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ पदग्रहण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता डॉ. अशोक खुराना उपस्थित होते. डॉ. टावरी म्हणाले, जुन्या काळातील आव्हाने आता बदलली आहेत. समाज सदन, सक्षम आणि शिक्षित झालेला आहे. त्यामुळे डॉक्टरांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ‘कट प्रॅक्टिस’मुळे डॉक्टरांची प्रतिमा डागळली जात आहे. यामुळे ‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’सारख्या सर्व जबाबदार संस्थांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वैद्यकशास्त्र दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे. याचे फायदा जर सर्वांना हवा असेल तर डॉक्टर-रुग्ण यात संवाद वाढणे आवश्यक आहे. -भावनिक बंध क्षीण होत आहेतडॉ. खुराना म्हणाले, डॉक्टर समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या अविरत आणि महत्त्वपूर्ण कार्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. मात्र, बदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांनी एकत्र येऊन यावर काम करणे आवश्यक आहे.- ‘एएमएफ’च्या अध्यक्षपदी डॉ. गोपाल अरोरा‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ची (एएमएफ) नवी कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. डॉ. गोपाल अरोरा यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. विनोद सुखीजा यांनी सचिव पदाचा पदभार सांभळाला. प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून डॉ. गौरी अरोरा, उपाध्यक्ष डॉ. टी. एस. उबेरॉय आणि डॉ. युनस शाह, सहसचिव डॉ. अजय देशपांडे आणि डॉ. अन्ने विल्कीसन, उपाध्यक्ष डॉ. ग्रीष्मा धिंग्रा आदींची निवड करण्यात आली.-विविध विषयांवर कार्यशाळापदग्रहण सोहळ्यानंतर विविध विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लेटेस्ट टेक्नालॉजीस् इन कॅटरॅक्ट मॅनेजमेन्ट’ या विषयावर प्रसिद्ध नेत्रराग रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत अग्निहोत्री, ‘ब्लड सेफ्टी’ या विषयावर लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे तर डॉ. प्रमोद गांधी यांनी ‘मधुमेह‘ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी दोनशेच्यावर डॉक्टर सहभागी झाले होते. कार्यक्रमाला डॉ. अरुण गाडे, डॉ. जयंत कोले, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. इकबाल खान, डॉ. संजय जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)