शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 20:50 IST

केवळ शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करून चालणार नाही.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'अटल संस्कृती गौरव' पुरस्कार

पुणे : अटलजींना शिक्षकांविषयी कमालीची आत्मीयता होती. शिक्षकांना समाजात पूर्वीसारखी प्रतिष्ठा मिळायला हवी, असे त्यांना नेहमी वाटायचे. सध्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अमंलबजावणीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा मी अध्यक्ष आहे. त्यामध्ये शिक्षकांना प्रतिष्ठा देण्यावर भर देण्यात येणार आहे. केवळ शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करून चालणार नाही. शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार, असा प्रश्न ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थित केला. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, सिद्धार्थ शिरोळे, गायिका गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली माशेलकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, 'राष्ट्रपुरुष आणि युगपुरुष असलेल्या अटलजींच्या नावाचा 'अटल संस्कृती गौरव' हा माझ्या आयुष्यातील सर्वोचच पुरस्कार आहे. सीएसआरला लौकिक मिळण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. परिवर्तन करताना कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि त्याला राजकीय पाठिंबा लागतो. अटलजींनी केवळ पाठिंबाच नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्य दिले.

 

आजपर्यंत १७ माशेलकर समित्या स्थापन झाल्या. सरकार अडचणीत असते, तेव्हा माशेलकर समिती स्थापन करते, असे अटलजी म्हणाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्यांची श्रद्धा होती. पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी 'जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान' अशी घोषणा केली. पोखरण येथील अणूचाचणीनंतर जगामध्ये भारताची प्रतिमा पूर्णपणे बदलली. तेथे भारताला खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचे श्रेय अटलजींना जाते. ११ मे हा तंत्रज्ञान दिवस असल्याचा निर्णयजी त्यांचाच होता.'

मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. 

-------------------

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संवाद, पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना सादर केल्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्य सादर केले.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणStudentविद्यार्थी