शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने अडवलेले पाणी जिरणार कसे?

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

जलतज्ज्ञ प्रफुल्ल कदम यांच्याशी पाणीप्रश्नावर गौरीशंकर घाळे यांनी केलेली चर्चा खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...

जलतज्ज्ञ प्रफुल्ल कदम यांच्याशी पाणीप्रश्नावर गौरीशंकर घाळे यांनी केलेली चर्चा खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी... पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काही जण नदीजोड प्रकल्पाचा पुरस्कार करतात, याबाबत आपली काय भूमिका? - समर्थन अथवा विरोध थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. अनेक छोटे छोटे पर्याय उपलब्ध असताना थेट नदीजोडचा अट्टाहास चुकीचा आहे. हे म्हणजे पैसे कमी पडले म्हणून घर विकायला काढण्यासारखा अतिरेकीपणा आहे. पावसाळ््याच्या तोंडावर राज्यात पाण्याबाबत चिंतेचे सावट आहे. या प्रश्नाकडे कसे पाहता? - चुकीच्या नियोजनाचा हा परिणाम आहे. पाणीप्रश्न समजलाच नाही, ही खरी समस्या आहे. पाण्याचा विचार करताना पाणी, ऊर्जा, शेती, पर्यावरण, रोजगार अशा पायाभूत घटकांचा एकत्रित विचार करावा लागेल. तज्ज्ञांच्या चर्चा, अधिकाऱ्यांच्या बैठकीतच पाणीप्रश्न अडकला आहे. तेच मुद्दे आणि कार्यक्रम वारंवार आपल्यासमोर येत आहेत. पण सध्या राज्यात ‘जलशिवार अभियान’ची मोठी चर्चा सुरू आहे. या नव्या योजनेबद्दल काय वाटते? - ‘जलशिवार’ ही काही नवीन योजना नाही. जुन्या योजनांचे हे नवे नाव आहे. १९७२ची रोजगार हमी, ८३ची कृषी पंढरी, ९२ची सर्वंकष पाणलोट विकास कार्यक्रम, हरियाली वगैरे. परंतु पाण्याच्या मूळ प्रश्नाशी या योजना निगडीत नाहीतच. आज जो ‘जलशिवार’चा गाजावाजा चालू आहे, तो हास्यास्पद आहे. प्रशासनाला पाणीप्रश्न कळला नाही याचा उघड पुरावा म्हणजे ‘जलशिवार’. ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ या संकल्पनेतच ते अडकले आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतच अडकले आहेत म्हणजे? - १९९२ ते २०१२ या २० वर्षांत राज्यात ८,२८,३२२.१६ लाख रुपये एवढा प्रचंड निधी आणि १७५ कोटी मनुष्य दिवस आपण या प्रश्नावर खर्च केले. तरीही जमिनीवरचं वास्तव लाजिरवाणं आहे. आज एका वर्षाचा पावसाचा ताण आपली गावे सहन करू शकत नाहीत. मग अशा कार्यक्रमांचे कौतुक कशाला? आठ-दहा गावांची यशोगाथा आणि काही विद्वानांची भाषणे यातून आपल्या राज्याचा पाणीप्रश्न संपला, असे मानता येणार नाही. या कार्यक्रमाच्या मर्यादेकडे तुम्ही पाहणार आहात की नाही? कोणत्या मर्यादांबाबत आपण बोलताय? - ‘पाणी अडवा’चा जलविज्ञाननिष्ठ विचार करण्याची वेळ आली आहे. भूगर्भात पाणी साठवण्याची एक क्षमता, मर्यादा असते. ती देशात ४३३ बीसीएम एवढी आहे. त्यापैकी कृत्रिम पद्धतीने ३६ बीसीएम इतकेच पुनर्भरण शक्य आहे. राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार २००४ च्या पावसापैकी केवळ २.३८ बीसीएम, तर २००८ साली २.७३ बीसीएम इतकेच पाणी जलसंधारणाच्या माध्यमातून रिचार्ज झाले आहे. ही टक्केवारी पाच टक्क्यांहून कमी आहे. जिथे जलसंधारणाला यश आले तिथे तसा भूस्तर आहे. म्हणजे मांजरा खडक, भेगा असणारी अकुहरी बसाल्ट अथवा भूपृष्ठावर मुरमाचा मोठ्या जाडीचा थर असणाऱ्या भागातच झिरपलेली दिसते. कोकणात तर लॅटेराइट खडक पाणीच धरू शकत नाही, अशी भूस्तराची प्रतिकूल परिस्थिती आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा निसर्गाच्या विरोधातील कार्यक्रम आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोणत्या उपाययोजनांचा आग्रह धरीत आहात? - अगदी सोप्या अशा ११ उपाययोजनांचा मी आग्रह धरतो. यातील पाच उपाय बिनपैशाचे तर सहा अल्प निधीत पार पडणारे आहेत. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उद्दिष्टांचा सूत्र नव्हे तर अस्त्र म्हणून वापर करणे, गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत पाणी नियोजनासाठी संरचना निर्माण करणे, वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन, समन्यायी पाणीवाटप, पाणी-वीज समन्वय कार्यक्रम, गाळ काढण्याचा वेगळा कार्यक्रम, प्रादेशिक नळपाणी पुरवठा, पाझर तलावाकडून साठवण तलाव, वृक्ष लागवड आणि गणनेची वेगळी संकल्पना, चारा लागवड, वेड्या बाभळीपासून वीजनिर्मिती प्रकल्प, चारा गवत आणि शाश्वत विकास असे हे उपाय आहेत. पाणी नियोजनाबाबत आपण संरचनेचा आग्रह धरता, हे थोडं नेमकेपणाने स्पष्ट कराल का?- गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत पाणी नियोजनाच्या दृष्टीने सुसूत्रता व समन्वय असणारी कोणतीच यंत्रणा आपणाकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे त्या त्या भागातील नेते, अधिकारी यांच्या मर्जीप्रमाणे चालू आहे. समन्वयाचा अभाव, नियोजनातील भोंगळपणा या संरचनेमुळे संपेल. विशेष म्हणजे यासाठी कसल्याच निधीची आवश्यकता नाही. समन्यायी पाणीवाटपाचा काय प्रश्न आहे ? - राज्यात ११ टक्के भूभागावर ५० टक्के पाणी व्यापले आहे. ४३ टक्के लोकसंख्या तुटीच्या खोऱ्यात आहे. लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण व ७ टक्के पूरप्रवण आहे. त्यामुळे विपुल पाणी असणाऱ्या क्षेत्रातून कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात पाणी नेण्याशिवाय पर्याय नाही. समन्यायी पाणीवाटपासारख्या घटनात्मक व कायदेशीर उपायांच्या अंमलबजावणीला पर्याय नाही. यातून राज्यातील सर्वच दुष्काळी भागाच्या किमान पाण्याचा प्रश्न सुटेल. पाणी-वीज समन्वयाचा मुद्दा विस्ताराने सांगाल काय? - पाणी नियोजनाती एक महत्त्वाची बाब म्हणजे विभाग नेहमी दुर्लक्षिला गेला तो म्हणजे वीज वितरण कंपनी. अश्वशक्तीप्रमाणे होणारी वीज आकारणी हे दुष्काळाचे एक कारण बनले आहे. आज २०० फुटांपेक्षा खोल पाण्याचा अमर्याद व अनियंत्रित उपसा विजेमुळेच शक्य आहे. राज्यातील शेतीसाठीचा वीजवापर १६,२५७ दशलक्ष युनिट इतका प्रचंड आहे. यावरून पाणीवापर आणि वीजवापर यातील संबंधांचे गांभीर्य लक्षात येईल. विविध घटकांचा विचार करीत सामायिक उद्दिष्ट निश्चित करून जर कार्यक्रम आखला, तरच पाणी नियोजनात क्रांतिकारक बदल शक्य आहे. ऐन पावसाळ्याच्या तोेंडावरही राज्याच्या विविध भागांतील दुष्काळी सावट चिंतेचा विषय आहे. जलतज्ज्ञ प्रफुल्ल कदम यांनी पाण्याविषयीचे हे धक्कादायक वास्तव मांडतानाच नेमके उपायही सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कदम यांच्या ‘उत्तर सोपे, प्रश्न अवघड’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या वेळी कदम यांनी सुचविलेल्या उपायांचा पुढील नियोजनात गांभीर्याने विचार करण्याच सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.