शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

येऊ कशी कशी मी नांदायला हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 03:18 IST

महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.

संजय कांबळे,बिर्लागेट- भातसा, बारवी, उल्हास, काळू अशा बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील रायते, सांगोडा, पिंपळोली आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.आतापर्यंत मुलाची नोकरी, घर, जमीनजुमला याकरिता बहुसंख्य वधूपक्षाचा आग्रह असायचा, मात्र आता घरात पाण्याची सोय असेल तरच पुढची बोलणी करू, असा पावित्रा मुलींच्या पालकांनी घेतल्याने कल्याण ग्रामीण भागातील वाड्या पाड्यातील गावातील मुलांची लग्ने होतात की नाही, या कल्पनेने त्यांच्या पालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र लगीनघाई सुरु होते. मुली पाहणे, देणे-घेणे बस भाडे, मानपान, मंडप, बॅण्डबाजा, बँजो, डिजे याचे बुकिंग सुरू होते. पत्रिका छापणे, त्या वेळीच वाटणे याची लगबग गावागावात दिसते. काही मुलींचे पालक लग्नाचा भरमसाठ खर्च करुन अक्षरश: कर्जबाजारी होतात. मात्र इतका खर्च करूनही लग्नानंतर आपल्या मुलीला आयुष्यभर डोक्यावरून पाण्याचे हंडे-कळशा वाहाव्या लागणार असतील तर अशा टंचाईग्रस्त गावांत त्यांची लग्ने करायची कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे. कल्याण ग्रामीण भागातील ४१ ग्रामपंचायतीमधील ६६ गावांमधील वाड्यापाड्यातील लोकांकरिता एक हजार ८५ जलस्रोत असून यामध्ये हातपंप, सार्वजनिक विहिरी, नळपाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे. बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे या कालबाह्य सोईसुविधा असून नसल्यासारख्या आहेत. भातसा, बारवी, काळू व उल्हास अशा चार बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील या गावांमध्ये उन्हाळ््यात महिलांना डोक्यावरुन हंडे-कळशा वाहव्या लागतात. रात्री-अपरात्री पाणी आणायला जावे लागते. सांगोडा गावांतील महिला पाणी आणण्यास गेली असता सर्पदंश होऊन गेली तर पिंपळोली गावातील कमलाबाई राहणे यांचा विंचू दंशाने जीव गेला. डोक्यावरून पाणी वाहण्यात आयुष्य गेल्याने महिलांच्या डोक्याचे केस गेल्याचे सरपंच सुनीता गायकर म्हणाल्या. मुलगा गरीब असला तरी चालेल, परंतु गावात, घरात पाण्याची सोय पाहिजे, असे विवाहेच्छुक मुलीचे पालक गणपत हिंदोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. >मुलीच्या सुखासाठीच घरच्यांचा विचारपाणी टंचाई, पीक, जनावरे याची वाताहत, यामुळे अशा गावात मुलगी द्यायला, नापसंती असल्याचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी सांगितले तर मुलीच्या सुखासाठी तिच्या घरच्यांनी असा विचार केला तर बिघडले कुठे? असा प्रश्न उशीद गावचे सुरेश गायकवाड यांनी विचारला. कल्याणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही असा विपरीत दावा कल्याण पाणीपुरवठा विभागाने केला कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे.