शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

येऊ कशी कशी मी नांदायला हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 03:18 IST

महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.

संजय कांबळे,बिर्लागेट- भातसा, बारवी, उल्हास, काळू अशा बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील रायते, सांगोडा, पिंपळोली आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.आतापर्यंत मुलाची नोकरी, घर, जमीनजुमला याकरिता बहुसंख्य वधूपक्षाचा आग्रह असायचा, मात्र आता घरात पाण्याची सोय असेल तरच पुढची बोलणी करू, असा पावित्रा मुलींच्या पालकांनी घेतल्याने कल्याण ग्रामीण भागातील वाड्या पाड्यातील गावातील मुलांची लग्ने होतात की नाही, या कल्पनेने त्यांच्या पालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र लगीनघाई सुरु होते. मुली पाहणे, देणे-घेणे बस भाडे, मानपान, मंडप, बॅण्डबाजा, बँजो, डिजे याचे बुकिंग सुरू होते. पत्रिका छापणे, त्या वेळीच वाटणे याची लगबग गावागावात दिसते. काही मुलींचे पालक लग्नाचा भरमसाठ खर्च करुन अक्षरश: कर्जबाजारी होतात. मात्र इतका खर्च करूनही लग्नानंतर आपल्या मुलीला आयुष्यभर डोक्यावरून पाण्याचे हंडे-कळशा वाहाव्या लागणार असतील तर अशा टंचाईग्रस्त गावांत त्यांची लग्ने करायची कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे. कल्याण ग्रामीण भागातील ४१ ग्रामपंचायतीमधील ६६ गावांमधील वाड्यापाड्यातील लोकांकरिता एक हजार ८५ जलस्रोत असून यामध्ये हातपंप, सार्वजनिक विहिरी, नळपाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे. बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे या कालबाह्य सोईसुविधा असून नसल्यासारख्या आहेत. भातसा, बारवी, काळू व उल्हास अशा चार बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील या गावांमध्ये उन्हाळ््यात महिलांना डोक्यावरुन हंडे-कळशा वाहव्या लागतात. रात्री-अपरात्री पाणी आणायला जावे लागते. सांगोडा गावांतील महिला पाणी आणण्यास गेली असता सर्पदंश होऊन गेली तर पिंपळोली गावातील कमलाबाई राहणे यांचा विंचू दंशाने जीव गेला. डोक्यावरून पाणी वाहण्यात आयुष्य गेल्याने महिलांच्या डोक्याचे केस गेल्याचे सरपंच सुनीता गायकर म्हणाल्या. मुलगा गरीब असला तरी चालेल, परंतु गावात, घरात पाण्याची सोय पाहिजे, असे विवाहेच्छुक मुलीचे पालक गणपत हिंदोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. >मुलीच्या सुखासाठीच घरच्यांचा विचारपाणी टंचाई, पीक, जनावरे याची वाताहत, यामुळे अशा गावात मुलगी द्यायला, नापसंती असल्याचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी सांगितले तर मुलीच्या सुखासाठी तिच्या घरच्यांनी असा विचार केला तर बिघडले कुठे? असा प्रश्न उशीद गावचे सुरेश गायकवाड यांनी विचारला. कल्याणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही असा विपरीत दावा कल्याण पाणीपुरवठा विभागाने केला कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे.