शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जुन्नरमध्ये आशा बुचकेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 14:50 IST

शिवसेना उमेदवार सोनवणे आणि बंडखोर आशा बुचके यांच्यातील लढाईमुळे अतुल बेनके निघण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अगदी हाच मुद्दा विरोधकांच्या पथ्यावर पडत असून जुन्नरमध्ये बंडखोरीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठऱणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केल्यांनंतर राज्यात बंडखोरी उदंड झाली होती. युती होताच, उभय पक्षांमध्ये बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्यावर जोर दिला. भाजपविरुद्धच्या बंडखोरांचे बंड काही प्रमाणात शांत करण्यात आले असले तरी शिवसेनेविरुद्धच्या बंडखोरांना रोखण्यात युतीला यश आले नाही. याचा सेनेला अनेक मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्षातून आलेले नेते आणि स्वपक्षातील नेत्यांचं नियोजन करण्यात भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच कस लागला. शिवसेनेतील नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवत उमेदवारी अर्ज सादर केले. अशीच काहीशी स्थिती जुन्नर मतदार संघात होती. मनसेचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले. त्यामुळे आशा बुचके यांच्या उमेदवारीचा मुद्दा संपुष्टात आला.  

दरम्यान बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या बुचके यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. बुचके यांच्या उमेदवारीमुळे सेनेच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. याचा फटका सरळ-सरळ शिवसेनेला बसणार आहे. तर फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांना होणार अशी चिन्हे आहेत.

शिवसेना उमेदवार सोनवणे आणि बंडखोर आशा बुचके यांच्यातील लढाईमुळे अतुल बेनके निघण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अगदी हाच मुद्दा विरोधकांच्या पथ्यावर पडत असून जुन्नरमध्ये बंडखोरीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठऱणार आहे.