शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या बळावर विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: June 30, 2014 00:48 IST

सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो,

विज्ञान भारतीच्या अधिवेशनाचा समारोप : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, जलवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी आयटी पार्कमधील कवि कुलगुरू कालिदास सभागृहात समारोप पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर होते. अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विजय भटकर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मनमोहन वैद्य, डॉ. व्ही. के. सारस्वत, के. ई. बासू, विज्ञान भारतीचे सहसचिव जयकुमार व जयंत सहस्रबुद्धे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, देशातील वैज्ञानिक चांगले काम करीत आहे. परंतु त्यांच्यात आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी हा दुरावा दूर करावा लागेल. याशिवाय केंद्रीयस्तरावर एक ‘थिंक टॅँक’ तयार केली जाणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या या समितीमध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश राहणार आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणाविषयी बोलताना, ते म्हणाले, या नदीत सोडण्यात येणाऱ्या खराब पाण्याचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार केला जात आहे. तसेच देशातील आयात व निर्यात शुल्कात सध्या सुमारे ३०० बिलियन डॉलर्सची तफावत आहे. ती कमी करण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करून इथेनॉलचा वापर वाढविण्याची गरज आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाचा समतोल राखावा लागेल. यासाठी रस्त्यावरील मोठ्या झाडांची कटाई न करता, त्यांचे प्रत्यारोपण व नरेगातर्गंत नवीन वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना समग्र व एकात्मिक दृष्टिकोनातून विज्ञानाची चर्चा व्हावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)