शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

तंत्रज्ञानाच्या बळावर विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: June 30, 2014 00:48 IST

सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो,

विज्ञान भारतीच्या अधिवेशनाचा समारोप : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : सध्या ‘लॅब’ मध्ये बंदिस्त असलेले विज्ञान-तंत्रज्ञान तळागळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच विकासाचा राजमार्ग प्रशस्त होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, जलवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी आयटी पार्कमधील कवि कुलगुरू कालिदास सभागृहात समारोप पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर होते. अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विजय भटकर, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मनमोहन वैद्य, डॉ. व्ही. के. सारस्वत, के. ई. बासू, विज्ञान भारतीचे सहसचिव जयकुमार व जयंत सहस्रबुद्धे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, देशातील वैज्ञानिक चांगले काम करीत आहे. परंतु त्यांच्यात आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी हा दुरावा दूर करावा लागेल. याशिवाय केंद्रीयस्तरावर एक ‘थिंक टॅँक’ तयार केली जाणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या या समितीमध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश राहणार आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणाविषयी बोलताना, ते म्हणाले, या नदीत सोडण्यात येणाऱ्या खराब पाण्याचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार केला जात आहे. तसेच देशातील आयात व निर्यात शुल्कात सध्या सुमारे ३०० बिलियन डॉलर्सची तफावत आहे. ती कमी करण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करून इथेनॉलचा वापर वाढविण्याची गरज आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाचा समतोल राखावा लागेल. यासाठी रस्त्यावरील मोठ्या झाडांची कटाई न करता, त्यांचे प्रत्यारोपण व नरेगातर्गंत नवीन वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना समग्र व एकात्मिक दृष्टिकोनातून विज्ञानाची चर्चा व्हावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)