शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाच जिल्ह्यांत वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:42 IST

अमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशील; जर्मन संस्थेचा अभ्यास

निशांत वानखेडे / रुपेश उत्तरवारनागपूर/यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८० पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल. 

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण  दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली. 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

  • सरासरी पावसात २०३० ते २०५० पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८० पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.
  • पावसाची तीव्रता २०५० पर्यंत ७ ते ११ मि. मी. व २०८० पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.
  • अति पावसाचे दिवस २०५० पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील. 
  • अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.
  • अत्याधिक पावसाची तीव्रता २०५० पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८० पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.  

तापमानाची स्थिती काय राहील?

  • २०३० ते २०५० पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८० पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.
  • अति तापमानाचे २०५० पर्यंत २५ ते ३० आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
  • अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५० पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८० पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस