शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांत वाढणार अति तापमान, पडणार अति पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 12:42 IST

अमरावती, यवतमाळ, नगर, धुळे, जालना संवेदनशील; जर्मन संस्थेचा अभ्यास

निशांत वानखेडे / रुपेश उत्तरवारनागपूर/यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, धुळे, अहमदनगर, जालना यांच्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे हवामान बदलाच्या परिणामाने संवेदनशील झाले आहेत. या सात जिल्ह्यांना २०५० ते २०८० पर्यंत अत्याधिक तापमान आणि अत्याधिक पावसाचा सामना करावा लागेल. 

जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, बोन, जर्मनीच्या वतीने येथील पोट्सडेम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने ‘नासा’च्या उपग्रहीय साधनांच्या आधारे संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील या सात जिल्ह्यांचा अभ्यास केला आहे. सरासरी पाऊस, पावसाचे चक्र, अति पावसाची वारंवारता, सरासरी तापमान, अत्यंत उष्ण  दिवस आणि काेरडे दिवस या सात निकषांवर अभ्यास करून २०३०, २०५० आणि २०८० साली या जिल्ह्यांची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावण्यात आला आहे. यासाठी हवामानाच्या ८ ते ९ माॅडेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी याबाबत माहिती दिली. 

सात जिल्ह्यांत पावसाची स्थिती

  • सरासरी पावसात २०३० ते २०५० पर्यंत १५ ते २० टक्के आणि २०५० ते २०८० पर्यंत २३ ते ३७ टक्के वाढ हाेईल.
  • पावसाची तीव्रता २०५० पर्यंत ७ ते ११ मि. मी. व २०८० पर्यंत ८ ते १३ मि. मी.पर्यंत वाढेल.
  • अति पावसाचे दिवस २०५० पर्यंत २५ ते ३० दिवस आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील. 
  • अत्याधिक पावसाची वारंवारता १ दिवस आणि ३ दिवसांपर्यंत वाढेल.
  • अत्याधिक पावसाची तीव्रता २०५० पर्यंत १५, १८ ते २० टक्के आणि २०८० पर्यंत १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढेल.  

तापमानाची स्थिती काय राहील?

  • २०३० ते २०५० पर्यंत १.५ अंश आणि २०५० ते २०८० पर्यंत २.७ अंशापर्यंत वाढलेले असेल.
  • अति तापमानाचे २०५० पर्यंत २५ ते ३० आणि २०८० पर्यंत ५५ ते ६५ दिवस वाढतील.
  • अत्याधिक काेरडे दिवस २०३० ते २०५० पर्यंत २ ते ३ आणि २०५० ते २०८० पर्यंत ४ ते ६ दिवस वाढतील.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस