शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 12:27 IST

Heavy raining in Mumbai: मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

ठळक मुद्देकाही गाड्या रद्द तर काहींचे वेळापत्रक बदलले

औरंगाबाद: शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. भायखळा, सायन, अंधेरीत पाणीच पाणी झालं आहे. पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.  तसेच, मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, भांडूप, कुर्ला, अंधेरी, मालाड, बोरिवली आणि कांदिवली येथील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. 

मुंबईतील या मुसळधार पावसाचा रेल्वेवरही मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. 

जालना-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी मनमाडपर्यंतच धावत आहे. तर मुंबई सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून, ही रेल्वे नांदेडहून सकाळी 10.05 ऐवजी दुपारी 1 वाजता धावणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसNandedनांदेडparbhani-pcपरभणीJalanaजालनाparli-acपरळीlaturलातूर