शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, 'या' गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 12:34 IST

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे.

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे.कोकण रेल्वे मार्गावरील 9 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.मंगला एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

मुंबई - मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. पुढचे 24 तास कोकण रेल्वेही बंद असणार आहे. तसेच मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ बंद केली आहे. कोकण रेल्वेने ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

कोकण रेल्वेची वाहतूक काही वेळ बंद झाली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने पुढील 24 तासांसाठी हा निर्णय घेतला. कोकण रेल्वे मार्गावरील 9 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 7 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (5 ऑगस्ट) तुतारी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर, डबल डेकर, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, जनशताब्दी  एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगला एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहेत. 

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. मडगाव-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस रविवारी (4 ऑगस्ट) पेण आणि पनवेलदरम्यान अडकली होती. या एक्स्पेसच्या पुढे आणि मागे दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने बराच वेळ ही एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले . एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. तसेच कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

मुंबई येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी विस्कळीत झाली होती. मनमाडकरांसह चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी नाशिक, मुंबई येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुंबई-हैदराबाद सुफरफास्ट एक्स्प्रेस, दादर-चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई-बिदर एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. काही गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, सोमवारीही काही गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

सोमवारी रद्द केलेल्या रेल्वेगाड्या 

- मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस- मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर- मनमाड-मुंबई-मनमाड एक्सप्रेस- भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस- पुणे-बिलासपुर एक्सप्रेस- एलटीटी-हातिया एक्सप्रेस

रत्नागिरी जिल्ह्याला पाऊस व वादळी वाऱ्यांनी दणका दिला. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवबाग गावाला सागरी अतिक्रमणाचा तडाखा बसला आहे. कर्ली खाडीपात्राचे पाणी गावात घुसले. समुद्राला आलेल्या उधाणामुळे देवबागमधील ख्रिश्चनवाडी, मोबारवाडीला फटका बसला. माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आंबेरी निर्मला नदीला पूर आला. त्यामुळे सायंकाळपर्यंत परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेNashikनाशिक