शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 10:58 IST

Amit Shah Interview on Maharashtra: महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले, घडाळ्याचे काटे मागे फिरविता आले तर ते वेगळ्या पद्धतीने करता येतील का, या प्रश्नावर शाह यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवर उत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून त्यांनी याद्वारे उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या राजकारणावर मोठे संकेत दिले आहेत. 

२०१९ आणि २०२४ मधील फरक सांगताना शाह यांनी 2019 मध्ये लोकांमध्ये अशी भावना होती की देशाला एक निर्णायक सरकार, निर्णायक नेत्याचा फायदा झाला आणि मोदी जे करत होते ते चांगले होते. तर २०२४ मध्ये भारताला एक महान राष्ट्र बनवण्याचा हा मार्ग आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. एक आत्मविश्वास वाढल्याचे दिसत असल्याचे सांगितले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले, घडाळ्याचे काटे मागे फिरविता आले तर ते वेगळ्या पद्धतीने करता येतील का, या प्रश्नावर शाह यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवर उत्तर दिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेला आम्हाला बहुमत मिळाले. परंतु शरद पवारांनी आमचे मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर केले. आम्ही युती म्हणून निवडणूक लढविली होती. आता ज्यांनी हे सुरु केले त्यांनाच ते संपवावे लागेल, असे शाह म्हणाले. तसेच तेव्हा कोणतेही नैतिक प्रश्न, नीतीमत्तेचे प्रश्न उपस्थित केले नाहीत. पत्रकार म्हणूनही हा तुमचा दुटप्पीपणा होता, असे आरोपही शाह यांनी केले. 

तसेच उद्धव ठाकरे परत येणार का, या प्रश्नावर शाह यांनी आमची आता शिवसेनेसोबत युती आहे आणि ते ते चांगले काम करत आहेत असे सांगत ठाकरेंना युतीचे दरवाजे उघडे नसल्याचे संकेत शाह यांनी दिले आहेत. 

विरोधकांची हवा वाटतेय...ताकदवर विरोधक नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक कंटाळवाणी होईल असे वाटत होते. परंतु गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुलीही शाह यांनी दिली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्र