शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

फेरीवाला कर्ज योजना देशात सुरू; महाराष्ट्रात मात्र ठप्प: केंद्र सरकारला राज्याचा ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 11:51 AM

केंद्र सरकारने देशभरातील फेरीवाल्यांंना मदत म्हणून विनातारण १० हजार रूपयांची कर्ज योजना केली सुरू

राजू इनामदार

पुणे: कोरोना टाळेबंदीनंतरच्या मिशन बिगीन मध्ये देशभरातील फेरीवाल्यांंना मदत म्हणून केंद्र सरकारने विनातारण १० हजार रूपयांची कर्ज योजना सुरू केली. दोनच महिन्यात देशातील दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांनी यात आघाडी घेतली. महाराष्ट्रात मात्र दोन महिने होऊन गेले तरी या योजनेतंर्गत एकाही फेरीवाल्याला कर्ज मिळालेले नाही. 

वरील तिन्ही राज्यातील महापालिकांनी नियोजन बद्धतेने काम करत आपल्या कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांना या पंतप्रधान स्वनिधी फेरीवाला आत्मनिर्भर योजनेत कर्ज मिळवून देण्यास सुरूवात केली आहे. राजस्थानातील जयपूर महापालिकेने तर दिनदयाल अंत्योदय योजना असे नामकरण करत अर्ज भरून घेणे सूरू केले. अन्य राज्यात तर कर्जवितरणही सुरू झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बंँका, सहकारी बँकांकडून या योजनेत विनातारण कर्ज देण्यात येते. केंद्र सरकारनेच त्यांंना तसे आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्रात मात्र या योजनेविषयी सर्वच महापालिका उदासिन आहेत. अनेक महापालिका, नगरपालिकांनी राष्ट्रीय फेरीवाला.समितीच्या माध्यमातून करायचे फेरीवाल्यांचे सर्वेक्षणच केलेले नाही. जिथे केले आहे तिथे अपुर्ण आहे. या क्षेत्रात काम करणार्या जाणीव, वंचित विकास, दिलासा, पथारी पंचायत या संघटनांकडील सदस्य नोंदणीनूसार राज्यामधील फेरीवाल्यांची संख्या ४५ लाख आहे. सरकारकडे दाखल नोंदींनूसार मात्र ही संख्या फक्त दीड लाख आहे. त्यांनाही या योजनेत कर्ज मिळावे म्हणून त्यांच्या महापालिकांचे प्रशासन काम करायला तयार नाही असा संघटनांचा आरोप आहे.

पुण्यातील फेरीवाल्यांची संख्या ४८ हजारपेक्षा जास्त आहे. नोंदणी झालेले मात्र फक्त १८ हजार आहे. सासवड, लोणावळा,व राज्यातील. अशा अनेक लहान नगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांची नोंदणीच केलेली नाही असे संघटनांचे म्हणणे आहे.

योजनेत पात्र होण्यासाठी नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. त्याचे अर्ज ऑन लाईन करणे बंधनकारक आहे. त्यात महापालिकेने दिलेला नोंदणी क्रमांक टाकावा लागतो. तो टाकल्याशिवाय अर्ज सबमीट होत नाही. ऑन लाइन अर्ज जमा करता येत नाही, ते जमले तरी नंबर नसल्याने तिथे सर्व फेरीवाल्यांचे अडते आहे. त्यावर ऊपाय म्हणून महापालिकने त्यांच्या संघटनेचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे असे योजनेच्या माहितीपत्रकातच नमूद आहे. पण प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

...................

राज्य सरकारने ऊच्च न्यायालयात.अलीकडेच एका जनहित याचिकेत प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात त्यांनी स्पष्टपणे आम्ही फेरीवाल्यांंना परवानगी देऊ शकत नाही असे म्हटले आहे. सरकारला आम्हाला पुन्हा ऊभे राहू द्यायचे आहे की नाही अशी शंका यावरून येत आहे. 

संजय शंके. राष्ट्रीय फेरीवाला फेडरेशनचे राज्य सचिव.

राज्य शासनाने त्वरीत केंद्राने आमच्यासाठी जाहीर केलेल्या फेरीवाला आत्मनिर्भर योजनेत लक्ष घालावे. महापालिकांंना त्यांच्या कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांंना योजनेचे मार्गदर्शन करण्याचे आदेश द्यावेत.

बाळासाहेब मोरे, सरचिटणीस, पथारी पंचायत, महाराष्ट्र राज्य

----//