शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

चौकशीच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 22, 2016 03:59 IST

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले.

मुंबई : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले. मात्र, कराराची मुदत संपल्यानंतर नियम डावलून पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीलाच चढ्या भावाने काम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एसटी महामंडळाने २00९ साली ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन आणले. पाच वर्षांचा करार करताना, एसटी प्रशासन आणि ट्रायमॅक्स कंपनीत झालेल्या करारानुसार, वर्षाला ७५ कोटींपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्यास, प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराने ट्रायमॅक्सला पैसे मिळणार होते, तसेच ७५ कोटींपेक्षा कमी तिकिटे विकली गेल्यास भरपाई म्हणूनही एसटी प्रशासन ट्रायमॅक्सलाच पैसे देईल, असे त्यात म्हटले होते. हा अजब करार करताना एसटीने आपल्या नफ्याचा विचार केला नाही. त्यामुळे या कराराची त्या वेळी एसटीकडून चौकशी झाली आणि काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही सेवा पुढील दोन वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्याऐवजी, पुन्हा ट्रायमॅक्सला देण्याचा निर्णय घेतला. यात तिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली. तरीही राज्य सरकारने दुर्लक्षच केले आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की, चौकशी होणे गरजेचे होते. झालेला व्यवहार संशयास्पद असल्याने त्याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती, परंतु त्याची दखल राज्य सरकारने घेतली नाही. पाच वर्षांत ट्रायमॅक्सला जवळपास १५0 कोटी रुपये देण्यात आले. आता पुढील पाच वर्षांसाठी दुप्पटच पैसे मोजावे लागतील. हा व्यवहार खूपच खर्चीक असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)>२१ पैशांवरून ३३ पैशांवरतिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याने, सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.