शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

चौकशीच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 22, 2016 03:59 IST

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले.

मुंबई : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले. मात्र, कराराची मुदत संपल्यानंतर नियम डावलून पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीलाच चढ्या भावाने काम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एसटी महामंडळाने २00९ साली ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन आणले. पाच वर्षांचा करार करताना, एसटी प्रशासन आणि ट्रायमॅक्स कंपनीत झालेल्या करारानुसार, वर्षाला ७५ कोटींपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्यास, प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराने ट्रायमॅक्सला पैसे मिळणार होते, तसेच ७५ कोटींपेक्षा कमी तिकिटे विकली गेल्यास भरपाई म्हणूनही एसटी प्रशासन ट्रायमॅक्सलाच पैसे देईल, असे त्यात म्हटले होते. हा अजब करार करताना एसटीने आपल्या नफ्याचा विचार केला नाही. त्यामुळे या कराराची त्या वेळी एसटीकडून चौकशी झाली आणि काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही सेवा पुढील दोन वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्याऐवजी, पुन्हा ट्रायमॅक्सला देण्याचा निर्णय घेतला. यात तिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली. तरीही राज्य सरकारने दुर्लक्षच केले आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की, चौकशी होणे गरजेचे होते. झालेला व्यवहार संशयास्पद असल्याने त्याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती, परंतु त्याची दखल राज्य सरकारने घेतली नाही. पाच वर्षांत ट्रायमॅक्सला जवळपास १५0 कोटी रुपये देण्यात आले. आता पुढील पाच वर्षांसाठी दुप्पटच पैसे मोजावे लागतील. हा व्यवहार खूपच खर्चीक असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)>२१ पैशांवरून ३३ पैशांवरतिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याने, सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.