शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

हे सरकार फार काळ टिकणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:57 AM

जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जनादेशाच्या पाठित खंजीर खुपसणारे हे सरकार फार काळ चालणार नाही. देशाचा इतिहास हेच सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील आमडी फाटा आणि धानला येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, निवडणूक काळामध्ये अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती तर ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकºयांची मोठी फसवणूक होते आहे. गुरुवारी पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकिकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात २००१ ते २०१७ पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्र्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर २०१९ ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही सरकारने केलेली मोठी लबाडी आहे.एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना कृषी शेती खाते कुणाकडे जावे, यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरी प्रेम दिसून येते. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस