शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 9:57 PM

या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे.

पुणे - या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे. या सरकारला दंगली शिवाय पुन्हा सत्तेवर येत येणार नाही त्यामुळे दंगली होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असा कानमंत्र ऍड प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिनी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील, लक्ष्मण माने तसेच इतर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्तिथ होते. आंबेडकर म्हणाले,  26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुद्धा हा दिवस साजरा केला. गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वोच नायलयाच्या न्यायाधीशांनी जाहीरपने संविधान दिन साजरा केल्याचे ऐकवत नाही. यंदा मात्र त्यांनी हा दिवस जाहीर साजरा करून संविधान विरोधी लोकांना पुन्हा निवडून देऊ नका असाच आदेश दिला आहे.     नोटा बंदीनंतर काळ्या नोटा कश्या बदलून दिल्या ते मोदींनी सांगायला हवं. नोटबंदीमध्ये 60-40 चा तुमचा सौदा होता. जलील तुमच्यावर केस झाली तर मी वकील होईल त्यातून मला मोदींना कोर्टात आणता येईल. तुमच्यावर केस झाली तर माझा पहिला साक्षीदार हे नरेंद्र मोदी असतील. कारण साक्षीदाराला काहीही विचारता येतं. या देशात टॅक्स न भरण हा एक व्यवहार आहे. त्याकडून टॅक्स घेणं योग्य आहार परंतु त्याला लुटलं जातंय. नोटा बदलण्याचा निर्णय उर्जित पटेलांचा होता. अरुण जेटली म्हणतायेत 6 महिने चालेल इतकंच गंगाजल आहे. 6 महिन्यांची गंगाजल आहे तर अरबीआय कडे पैसे मागण्यास का गेलात. एन पी ए मधील 80 टक्के पैसे परत येणार नाहीत अशी परिस्तिथी आहे. 2019 ला हे सरकार आलं तर तुमचं बँकेतील खाते बुडेल. सरकारकडे पैसे नसल्याने लोकांना पैसे बँकेतून काढण्यावर बंधने येत आहेत. मनुवाद आणायचा असेल तर लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत असावे लागतात. त्यामुळे मनुवाद आणण्यासाठी सरकार लोकांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करत आहे. परत आलेल्या नोटा किती होत्या हे सांगण्यासाठी दीड वर्ष का लागला असा प्रश्न आहे. मोदींनी नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंम्बरची तारीख दिली पण एन आर आय लोकांना 31 मे पर्यंतची मुदत कशी दिली. मोगलाई मराठे म्हणतात आपल्या सत्तेत वाटा नको म्हणून ते 12 जागा देखील द्यायला तयार नाहीत. काँग्रेस आणि बी जे पी चं नातं काय आहे ते मला माहितीये. मला काही वेगळी दूषणं लावता येत नाही म्हणून काँग्रेस मला बिकाऊं म्हणते. सिंचन घोटाळ्यामध्ये कोण मंत्री आहेत त्याचं नाव मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाला सांगत नाही. मक्तेदारांची सत्ता गाडून टाकायला हवी. काँग्रेसला वाटते तेच केवळ सेक्युलर आहेत. 4 राज्यांच्या निवडणुकीनंतर चित्र वेगलं असेल. 

आयोध्याच्या विषयामुळे दंगल होईल. पोलीस म्हणताईत मला संरक्षण घ्या. कारण त्यानां माहितीये कि दंगल होणार आहे. दंगलीशिवाय या सरकारकडे काही राहिलेलं नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे दंगल होणार नाही याची दक्षात आपण घ्यायला हवी.  मोदींच्या चेहऱ्यावरची रोनाक गेलीये आता चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. चिंतेने ग्रासलेला माणूस काहीही करू शकतो. म्हणून आता आयोद्धचा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे. एक माहोल तयार केला जातोय. हा माहोल दंगलीसाठी तयार केली जात आहे. दंगलीशिवाय या सरकारला पून्हा सत्तेवर येता येणार नाही. या देशात बदल आणायचा असेल तर संविधानिक मार्गाने आणायला हवा.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणBJPभाजपा